Posts

Image
*मा प्रताप (भाऊ) कदम वाढदिवस विशेष* .....  ................................ जिवंत नागाची पुजा करणारे गाव म्हणून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर ओळख असणारे गाव नागपंचमीचे ३२, शिराळा, पैलवानांची खान म्हणून प्रसिद्ध असणारा हा तालुका आहे. आणि याच तालुक्यातील  तांबड्या मातीची अविरतपणे सेवा करणारे सर्वांचे लाडके कुस्ती प्रेमी आणि कुस्तीसाठी सदैव सेवा देण्यास बांधील असणारे *आमचे मित्र व कुस्ती प्रसारक प्रतापसिंह कदम (भाऊ)*. एकदम सच्चा दिलाचा दिलदार, तोंडावर रोखठोक बोलणं पटलं तर ठिक, नाही पटलं तर त्याहुन ठीक माननारा प्रताप कदम . आमची ओळख तशी कुस्तीच्या मैदानावरच झाली.     अनेक मैदानामध्ये आयोजकांना सन्मानपत्र देऊन सन्मान करणारा हा अवलिया कोण मला जाणून घेण्याची उत्सुकता लागली. मी न राहुन प्रतापराव कदम यांना विचारले  तुम्ही प्रत्येक गावच्या मैदानात प्रमाणपत्र देता याच्या मागचा उद्देश काय? तेंव्हा प्रतापभाऊंनी जे उत्तर दिले ते म्हणजे *आज जी कुस्ती लयास चालली आहे ती कुठतरी टीकावी ,वाढावी म्हणून मी पदरमोड करून हे कार्य चालु केले आहे*. खुपचं बरं वाटलं हे वा...

मांगरूळच्या श्रीमती रूक्मीणि कृष्णराव पाटील यांचे हृदयविकाराणे निधन

Image
मांगरूळच्या श्रीमती रूक्मीणि कृष्णराव पाटील यांचे हृदयविकाराणे निधन श्रीमती रूक्मिणी कृष्णराव पाटील यांचे दि. ०९/०९/२० रोजी रात्री ९.०० वाजता  हृदयविकाराने निधन झाले. त्या ८२ वर्षाच्या होत्या.    रूक्मिणी पाटील (काकू)  यांचेवर कोल्हापूर येथे खाजगी रूग्नालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.        पती कृष्णराव पाटील (गुरूजी) यांच्या निधनानंतर श्रीमती रूक्मिणी कृष्णराव पाटील यांनीच आपल्या तिनही मुलांचा सांभाळ केला. मोठा मुलगा फत्तेसिंह पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक (ips) तर मधला मुलगा जयकर पाटील शासकीय दुध योजनेत  कार्यरत आहेत. सर्वात लहान संग्रामसिंह पाटील हे संस्थापक चेअरमन कृष्णराव पाटील पत संस्था मांगरूळ आपली मुलं कर्तुत्ववान असल्याचे आई रूक्मिणी पाटील (काकू) यांना कौतुक होते.            मांगरूळ येथील तालुका पंचायत समिती शिराळा माजी सदस्य रंगराव भाऊराव पाटील यांच्या त्या थोरल्या वहिनीसाहेब होत्या. संपुर्ण ५० -६० लोकांचे एकत्र कुटूंबामध्ये श्रीमती रूक्मीणि पाटील काकूंना नेहमीच आदराचे स्थान होत...

*मा सरपंच पै प्रकाश पाटील वाढदिवस विशेष*

Image
🌹 *मा सरपंच पै प्रकाश पाटील वाढदिवस विशेष*🌹 ...........................  ✍ *लेखन- पै अशोक सावंत / पाटील*- सोंडोलीकर श्रीमंत मनाचा, आदर्श विचारांचा, मित्रांच्या जिव्हाळ्याचा, नाती जपनाराचा, वाढदिवस एका *आदर्श व्यक्तिमत्त्वाचा, कुस्तीसंघटकाचा* ...........      माणुस कुठे जन्माला आला, कुणाच्या घरात जन्माला आला, कुठल्या गावात जन्माला आला, कुठल्या जातीत जन्माला आला, व किती जगला याच्यापेक्षा तो कसा जगला ,कसा वागला ,कसा लढला, याला फार महत्त्व आहे .............      आपल्या जगण्याणे ,आपल्या वागण्याणे , आपल्या स्वभावाने लोकप्रिय ठरलेले व्यक्ती मत्व म्हणजे  *पै प्रकाश पाटील (दादा) सोंडोलीकर* यांचा आज वाढदिवस..............   शाहु महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गाव हे *प्रकाश पाटील* यांच  जन्मगाव.  *प्रकाश पाटील* यांना लहानपणापासून कुस्ती सारख्या रांगड्या खेळाची भारी आवड वयाच्या १०व्या  वर्षी  गावातील तालमीत कुस्ती सरावाचा श्रीगणेशा केला इयत्ता सातवी पर्यंत गावात शि...

राहुलला पुरस्कार मिळाला अभिनंदन ! पण ३८ वर्ष झली राम वनवासात का?

Image
राहुलला पुरस्कार मिळाला अभिनंदन ! पण ३८ वर्ष झली राम वनवासात का?  आज राहुल आवारे यांना आर्जुनविर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा खऱ्याअर्थाने महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणावा लागेल. अनेक खडतर प्रवास करत पै. राहुल आवारे लढला. एवढंच काय आपल्या शांत स्वभावाने त्यांनी संपुर्ण भारताचे लक्ष वेधले. अशा या प्रामाणिक, शांत आणि संयमी पैलवानाला केंद्र शासनाचा अर्जुनविर पुरस्काराने सन्मान होत असताना महाराष्ट्राच्या मातीला न्याय मिळाला हे मात्र खरे.             एकीकडे पै.राहुल आवारे यांना आर्जुनविर पुरस्काराने सन्मानित केले. त्याचा आनंद संपुर्ण महाराष्ट्रात होत आहे.  दुसरीकडे कुस्तीतील जादुगार १९८२ ला काॅमनवेल्थ गेममधुन गोल्डमिडल घेतलेल्या राम सारंग यांचेवर अन्याय होताना दिसत आहे.  आज प्रामुख्याने मान्यता प्राप्त चार गेम आहेत त्यामध्ये एशियन गेम्स, काॅमनवेल्थ गेम,. वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि आॅलंपिक या चार गेममध्ये महाराष्ट्राचे मिडल असणारे स्वर्गिय पै. गणपतराव आंदळकर, पै. मारूती माने, पै.हरिषचंद्र बिराजदार, पै. राम सारंग सर आणि पै. राहुल...

प्रतीक्रिया वाचल्या की आश्रुंना आवरणे कठीण होते. जर मामा सारखी माणसं प्रत्येक रूग्णालयास मिळाली तर खरंच असं कोरोनासारखं संकट आम्ही हसत- हसत स्विकारण्यास तयार आहे. असे अनेकजन सांगत होते.

Image
शिराळा उपजिल्हा रुग्णालयात कोरोना ग्रस्तांची सेवा करणारा संदिप मामा मनोजकुमार मस्के - चिखली शिराळा उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाग्रस्तांचा देवमाणूस  म्हणुन ओळखले जाणारे  संदिप मामा         गेले काही दिवस झाले शिराळा येथे उपजिल्हा रुग्णालयात संदिप मामा यांच्या रूपाने परमेश्वर असल्याचे अनेक कोरोनाग्रस्त पेशंट सांगत आहेत. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात कोविडसेंटर चालु असल्याने एकुण ३५ च्या आसपास येथे कोरोनाबाधीत रुग्ण आहेत.  या सर्व पेशंटची विचारपुस व उठाठेव हे एकटे संदिप मामा करत असतात. लादी पुसणे, पेशंटना जेवन देणे, गोळ्या देणे, पेशंटना काही हवं असल्यास ते लगेच उपलब्ध करून देतात. शंभरवेळा खालीवर करत पेशंटना सेवा पुरविण्यातच मामा आनंद मानतात.            संदिप मामा हे कोल्हापुर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आहेत.  ते कोल्हापुर येथील सिपीआर या रुग्णालयात वाॅर्डबाॅय म्हणुन काम करत होते. गेली दोन महिने झाले ते शिराळा उपजिल्हा रुग्णालयात वाॅर्डबाॅय म्हणुन आले आहेत. कोरोना बाधीतांचा संपुर्ण वाॅर्डची जबाबदारी संदि...

अखेर तो कोरोनावर मात करून सुखरूप आला आपल्या घरी ....

Image
अखेर तो कोरोनावर मात करून सुखरूप आला आपल्या घरी . गेले तेरा-चौदा दिवस एक खडतर प्रवास करत तो कोरोनाला हरवुन आज आपल्या कुटूंबात सुखरुप आल्याने आई व बायकोला आनंदाश्रु आवरेनाशे झाले.        मांगरूळ गावचा पोपट मस्के हा आरोग्य खात्यात नोकरी करत असल्याने त्यांचा संपर्क अनेक कोरोना बाधीतांशि आला होता. संपुर्ण सुरक्षा पाळुन सुद्धा त्याला कोरोनाने पकडले. पण पोपट फार धाडसी असल्याने  लक्षणे जाणवताच तो तपासनीस स्वत:हुन समोर आला. तपासणीत तो कोरोनाग्रस्त आहे हे समजताच उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल झाला. चौदा-पंधरा दिवस उपचार घेऊन अखेर तो आपल्या कुटुंबात सुखरूप आल्याने गावातील लोकांनी त्यांचे स्वागत केले.         आज पोपट घरी आला हा आनंद त्याची आई पत्नी व मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आपले अश्रु लपवत त्यांची आई व पत्नी यांना काय करु आणि काय नको अशि त्यांची अवस्था झाली होती. गावातील ही पहीलीच व्यक्ती कोरोनाला हरवुन आल्याने सर्वांना त्याचा अभिमान वाटत होता.       आपण कोरोनावर मात करू शकतो हे त्याने उदाहरणासहीत पट...

तुटलेल्या झाडाला फुटलेली पालवी जगणं शिकवते

Image
जगण्याची जीद्द प्रभळ असेल तर मनुष्य कसल्याही संकटातुन आपले जीवन जगत असतो. आज कोरोनाच्या भितीने संपुर्ण मनुष्य प्राणी भयभीत आहे. खरं पाहता कोरोनाने कमी आणि भितीनेच जास्त लोकं मरत असल्याचे लोकांच्यात बोलले जात आहे.           आजपर्यंत माणसं पैशासाठी झटत होती. कोणाकडे जाण्यास सुद्धा वेळ मिळत नव्हता. प्रत्येकजन आपापल्या कामात गुंतलेला असताना  संपुर्ण मानव समाज फक्तन- फक्त जगण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना सारख्या महामारिच्या  संकटाची भीती पशुपक्षी , प्राण्यांच्यात कुठेही पाहायला मिळत नाही. सगळे कसे निसर्गाचा आनंद घेत जगत आहेत.        खरं पाहता माणसाला जगण्यासाठी पैसा लागतो ही व्याख्याच जणू या निसर्गाने खोडून टाकली. कारण माणसांपेक्षा जास्त आण्णाची गरज ही हत्तीला असते. मात्र हत्तीला आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी पैशाची आवश्यकता भासत नाही. पैशाची गरज आहे ती फक्त माणवाला त्यामुळे जे महामारिसारखे संकट उभे ठाकले याला जबाबदार फक्त माणवजातीच असू शकते. पशुपक्षी किंवा निसर्ग याला दोषी नाही.       आज ...