Posts

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.

Image
*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*. *मनोजकुमार मस्के, मांगरूळ* शिराळा उत्तर भागातून माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या थोरल्या सुनबाई राजेश्वरी रणधीर नाईक या प्रचंड मतांनी जिल्हा परिषदेत निवडून आल्या आणि गावोगावी एकच चर्चा रंगली – “साहेबांची सून आली, आणि मन जिंकून गेली!” घरात राजकारणाचा गाडा अभ्यास… पण पाय मात्र मातीत घट्ट रोवलेले. रणधीर नाईक यांचा अभ्यासू स्वभाव आणि सासरे साहेबांचा दीर्घ अनुभव – या दोन्हींची शिदोरी घेऊन राजेश्वरीताई मैदानात उतरल्या. महिला आरक्षण पडलं आणि पहिल्यांदाच त्या जिल्हा परिषद उत्तर विभागातून उभ्या राहिल्या. पण खरं सांगायचं तर, त्या उभ्या राहिल्या त्या फक्त निवडणुकीला नाही… तर लोकांच्या आशांना, अपेक्षांना आणि विश्वासाला. पहिल्यांदाच निवडणूक लढवणं म्हणजे साधी गोष्ट नाही गं बाई… गावोगावी फिरायचं, दारोदार जायचं, प्रत्येकाचं ऐकून घ्यायचं. पण ताईंनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. कुणाच्या शेतात उभं राहून गप्पा मारल्या, कुणाच्या ओसरीवर बसून चहा घेतला, त...

पहिल्याच प्रयत्नात दमदार विजय; मांगले मतदारसंघाचा विराजदादा नाईक यांचेवर विश्वास..

Image
*पहिल्याच प्रयत्नात दमदार विजय; मांगले मतदारसंघाचा विराजदादा नाईक यांचेवर विश्वास*.. मनोजकुमार मस्के, मांगरूळ  दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मांगले जिल्हा परिषद मतदारसंघाने ऐतिहासिक निकाल दिला. प्रचंड मताधिक्याने विराजदादा नाईक विजयी झाले आणि पहिल्याच निवडणुकीत त्यांनी यशाची पहिली भव्य पायरी गाठली. हा विजय केवळ मतांचा आकडा नाही; तो विश्वासाचा, जिद्दीचा आणि लोकांमध्ये राहून कमावलेल्या नात्यांचा विजय आहे. विराजदादांची ही पहिलीच निवडणूक. राजकीय घराण्यात जन्म असूनही त्यांनी शॉर्टकटचा मार्ग निवडला नाही. वडील माजी आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या छायेखाली वाढताना राजकारणाचे धडे त्यांनी नक्कीच गिरवले; पण त्या आधी स्वतःची ओळख निर्माण करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उद्योग क्षेत्रात नाव कमावत त्यांनी स्वतःची स्वतंत्र छाप निर्माण केली. घरात राजकीय वारसा असताना पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडणूक सहज लढवून राजकारणात प्रवेश करणे त्यांच्यासाठी अवघड नव्हते. पण विराजदादांनी घाई केली नाही. त्यांनी निवडणुकांपासून दूर राहून संपूर्ण तालुक...

*परदेशातून मातीत… आणि मातीतून माणसांच्या मनात*

Image
*परदेशातून मातीत… आणि मातीतून माणसांच्या मनात* शिराळा तालुक्यातील जनसुराज्य पक्षाच्या उमेदवार  साईतेजस्विनी देशमुख यांनी जवळपास ४,०७६ मताधिक्यांनी मिळवलेला विजय हा केवळ निवडणुकीचा निकाल नाही, तर तो *जनतेने दिलेल्या विश्वासाचा, प्रेमाचा* आणि स्वीकाराचा कौल आहे. खरं तर अल्पावधीत परदेशातून थेट मायभूमीत आणि तेही ग्रामीण भागात येऊन इतक्या कमी काळात लोकांच्या मनात घर करणं, ही फार मोठी गोष्ट आहे. हल्लीच्या राजकारणात अशी उदाहरणं विरळच. पण *साईतेजस्विनी देशमुख* यांनी हे करून दाखवलं. आजोबांचा वारसा आणि आई-वडिलांचा आशीर्वाद या दोन मजबूत पायावर उभी राहून तिने लोकांशी संवाद साधला. मात्र ती केवळ “कोणाची तरी नात” म्हणून उभी राहिली नाही, तर “तुमच्यातलीच एक लेक” म्हणून ती जनतेसमोर आली—आणि हीच तिच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरली. अचानक परदेशातून येऊन, कुठलाही दुरावा न ठेवता, अगदी मनमुराद जनमानसात मिसळणं आजच्या राजकारणात फारसं बघायला मिळत नाही. पण *साईतेजस्विनीचा* तो हसरा, निरागस आणि आश्वासक चेहरा… लोकांशी आपुलकीने बोललेले चार शब्द… जनमानसात जमिनीवर बसून खाल्लेली भाकरी… या सगळ्या गोष्टी एखाद...

*“जनशक्ती हरली, पण माणूस हरला नाही…”*

Image
*“जनशक्ती हरली, पण माणूस हरला नाही…”* *मनोजकुमार मस्के, मांगरूळ* नुकत्याच हाती आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांनी मनाला अक्षरशः चटका लावला. कोकरूड जिल्हा परिषद उमेदवार विनोद पन्हाळकर आणि पंचायत समितीचे उमेदवार प्रमोद पाटील — सामान्य कुटुंबातून आलेली ही दोन नावं आज आकड्यांत हरली असली, तरी लोकांच्या हृदयात त्यांनी अढळ जागा निर्माण केली आहे. ही केवळ निवडणूक नव्हती. हा दोन गरीब घरांत जन्मलेल्या पोरांचा स्वाभिमानाचा संघर्ष होता. गेले कित्येक दिवस पायाला भिंगरी बांधून, अंगातला जीव रानात घालून, कधी अन्नाचा कणही न खाता त्यांनी रात्रंदिवस एक केलं. गावागावांत फिरून, माणसांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांनी मत नव्हे तर विश्वास मागितला. विकासाच्या गप्पा नव्हत्या, तर वेदनांची भाषा होती. आणि तरीही… निकाल वेगळाच लागला. आज खरंच असं वाटतं — धनशक्तीपुढे जनशक्ती हरली. राजकीय वारसा आणि साठवून ठेवलेला पैसा यांच्या भिंतीपलीकडे सामान्य माणसाची किंमत किती नगण्य आहे, हे या निकालांनी पुन्हा एकदा ठसठशीतपणे दाखवून दिलं. जनता कितीही ठरवो, पण सत्तेच्या आणि पैशाच्या पुढे गरिबाला विचारणार तर...

*“संघर्षातून घडलेला अभिमानाचा वारसा”*

Image
*“संघर्षातून घडलेला अभिमानाचा वारसा”* मांगरूळ गावचा आधारवड, कष्टांची मूर्ती, संघर्षाचा जिवंत इतिहास असलेले *ज्ञानदेव रामचंद्र मस्के* — सर्वांचे लाडके *डी. आर. मस्के आप्पा*, शुक्रवार दि. 06/02/ 2026 रोजी, अल्पशा आजाराने आपल्यातून कायमचे निघून गेले. वय वर्षे 65. त्यांच्या जाण्याने मांगरूळ गावचं नव्हे तर एका संपूर्ण संघर्षयात्रेचं पान बंद झालं. उंचीने थोडेसे ठेंगणे असले तरी विचारांनी, बुद्धीने आणि जिद्दीने ते डोंगराएवढे होते. शिक्षण फारसं झालं नव्हतं, पण अनुभव, अभ्यास आणि व्यवहारज्ञान इतकं प्रखर होतं की मोठमोठ्या शिकलेल्या अधिकाऱ्यांनाही लाजवेल असं त्यांचं बोलणं असायचं. आयुष्याची सुरुवात गिरणी कामगार म्हणून झाली. मेहनत केली, घाम गाळला… पण संपाच्या आंदोलनात नोकरी गेली. त्या क्षणी अनेकजण खचले असते, पण *डी. आर. आप्पा कधीच हार मानणाऱ्यातले नव्हते*. नोकरी गेल्यावर ते गावी परतले. वडिलोपार्जित शेती कसू लागले. गरिबी होती, अडचणी होत्या, पण घरात परमेश्वराने दोन लक्ष्मी दिल्या — दोन मुली. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी, आई-वडील, पत्नी… सगळ्यांचं ओझं एकट्या डी. आर. आप्पांच्या खांद्यावर होतं...

मातेचे दु:ख मातेलाच ठावे‘घाईत येतोस आणि परत जातोस... आता कधी येशील?’

Image
मातेचे दु:ख मातेलाच ठावे ‘घाईत येतोस  आणि  परत जातोस...  आता कधी येशील?’ - मधुकर भावे अजितदादा गेले... सर्वांनाच एक दिवस जायचे आहे... पण, दादांना आलेले मरण असे यायला नको होते... हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अनेकजण अचानक जातात... आमचे डॉ. गोवर्धनलाल पाराशर चहा पिता-पिता असेच अचानक गेले. दादांचे जाणे हे अचानक नाही... अत्यंतू क्रूर अशा काळाने त्यांच्यावर झडप घातली. दादांच्या मृत्यूचा धक्का इतका तीव्र होता की, अख्खा महाराष्ट्र हादरून गेला... सर्वांची एकच भावना होती की, ‘अरेरे’... असे मरण नको यायला होते...’ शिवाय अगदी बारामतीच्या वेशीजवळ येऊन दादा अचानक गेले... बारामतीच्या त्या धावपतट्टीवर दादांचे विमान आतापर्यंत इतक्यावेळा उतरले अाहे की, दादांना तो हवाई मार्ग पाठ झाला होता... दादा ‘पायलट’ असते तर त्यांनी काळोखातही ते विमान उतरवले असते... इतकी ती धावपट्टी दादांना माहिती होती... यापूर्वी विमान अपघातात माधवराव शिंदे असेच गेले... तो झटकाही मोठा होता. पण, त्यांचे छोटे विमान वादळात सापडले होते... तेही प्रचाराकरिताच जात होते. त्या घटनेलाही आता १५ वर्षे झाली. आंध्र प्रद...

मातीशी नातं जपणारा, महानगरात स्वतःची ओळख घडवणारा माणूस – कृष्णा बापू पाटील

Image
मातीशी नातं जपणारा, महानगरात स्वतःची ओळख घडवणारा माणूस – कृष्णा बापू पाटील मनोजकुमार मस्के, मांगरूळ  शिराळा तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेला, पण मनाने अख्ख्या शहराला आपलंसं करणारा माणूस म्हणजे कृष्णा बापू पाटील. मोठेपण हे पदाने येत नाही, तर माणुसकीने येतं, हे त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासातून दाखवून दिलं आहे. गावाकडची माती अंगावर असतानाच त्यांनी मुंबईसारख्या प्रचंड, धावपळीच्या महानगरात पाऊल ठेवलं. ओळखी नव्हत्या, पाठबळ नव्हतं, नाव नव्हतं — पण स्वप्नं मोठी होती आणि मन स्वच्छ होतं. अशा शहरात टिकणं सोपं नसतं, पण कृष्णा बापूंनी हार मानली नाही. कष्ट, संयम, आणि प्रामाणिकपणा या भांडवलावर त्यांनी राजकारणात हळूहळू आपलं कौशल्य सिद्ध केलं आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. अतिशय साधेपणा, प्रामाणिकपणा आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याची वृत्ती – हीच त्यांची खरी ओळख. मोठ्या शहरात राहूनही त्यांचा स्वभाव कधी बदलला नाही. आजही ते तितक्याच सहजतेने सामान्य माणसाशी बोलतात, त्याचं दुःख ऐकतात आणि शक्य तेवढी मदत करतात. कुठलाही गाजावाजा नाही, कुठलीही प्रसिद्धीची हाव ना...