*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.
*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*. *मनोजकुमार मस्के, मांगरूळ* शिराळा उत्तर भागातून माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या थोरल्या सुनबाई राजेश्वरी रणधीर नाईक या प्रचंड मतांनी जिल्हा परिषदेत निवडून आल्या आणि गावोगावी एकच चर्चा रंगली – “साहेबांची सून आली, आणि मन जिंकून गेली!” घरात राजकारणाचा गाडा अभ्यास… पण पाय मात्र मातीत घट्ट रोवलेले. रणधीर नाईक यांचा अभ्यासू स्वभाव आणि सासरे साहेबांचा दीर्घ अनुभव – या दोन्हींची शिदोरी घेऊन राजेश्वरीताई मैदानात उतरल्या. महिला आरक्षण पडलं आणि पहिल्यांदाच त्या जिल्हा परिषद उत्तर विभागातून उभ्या राहिल्या. पण खरं सांगायचं तर, त्या उभ्या राहिल्या त्या फक्त निवडणुकीला नाही… तर लोकांच्या आशांना, अपेक्षांना आणि विश्वासाला. पहिल्यांदाच निवडणूक लढवणं म्हणजे साधी गोष्ट नाही गं बाई… गावोगावी फिरायचं, दारोदार जायचं, प्रत्येकाचं ऐकून घ्यायचं. पण ताईंनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. कुणाच्या शेतात उभं राहून गप्पा मारल्या, कुणाच्या ओसरीवर बसून चहा घेतला, त...