Posts

मातेचे दु:ख मातेलाच ठावे‘घाईत येतोस आणि परत जातोस... आता कधी येशील?’

Image
मातेचे दु:ख मातेलाच ठावे ‘घाईत येतोस  आणि  परत जातोस...  आता कधी येशील?’ - मधुकर भावे अजितदादा गेले... सर्वांनाच एक दिवस जायचे आहे... पण, दादांना आलेले मरण असे यायला नको होते... हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अनेकजण अचानक जातात... आमचे डॉ. गोवर्धनलाल पाराशर चहा पिता-पिता असेच अचानक गेले. दादांचे जाणे हे अचानक नाही... अत्यंतू क्रूर अशा काळाने त्यांच्यावर झडप घातली. दादांच्या मृत्यूचा धक्का इतका तीव्र होता की, अख्खा महाराष्ट्र हादरून गेला... सर्वांची एकच भावना होती की, ‘अरेरे’... असे मरण नको यायला होते...’ शिवाय अगदी बारामतीच्या वेशीजवळ येऊन दादा अचानक गेले... बारामतीच्या त्या धावपतट्टीवर दादांचे विमान आतापर्यंत इतक्यावेळा उतरले अाहे की, दादांना तो हवाई मार्ग पाठ झाला होता... दादा ‘पायलट’ असते तर त्यांनी काळोखातही ते विमान उतरवले असते... इतकी ती धावपट्टी दादांना माहिती होती... यापूर्वी विमान अपघातात माधवराव शिंदे असेच गेले... तो झटकाही मोठा होता. पण, त्यांचे छोटे विमान वादळात सापडले होते... तेही प्रचाराकरिताच जात होते. त्या घटनेलाही आता १५ वर्षे झाली. आंध्र प्रद...

मातीशी नातं जपणारा, महानगरात स्वतःची ओळख घडवणारा माणूस – कृष्णा बापू पाटील

Image
मातीशी नातं जपणारा, महानगरात स्वतःची ओळख घडवणारा माणूस – कृष्णा बापू पाटील मनोजकुमार मस्के, मांगरूळ  शिराळा तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेला, पण मनाने अख्ख्या शहराला आपलंसं करणारा माणूस म्हणजे कृष्णा बापू पाटील. मोठेपण हे पदाने येत नाही, तर माणुसकीने येतं, हे त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासातून दाखवून दिलं आहे. गावाकडची माती अंगावर असतानाच त्यांनी मुंबईसारख्या प्रचंड, धावपळीच्या महानगरात पाऊल ठेवलं. ओळखी नव्हत्या, पाठबळ नव्हतं, नाव नव्हतं — पण स्वप्नं मोठी होती आणि मन स्वच्छ होतं. अशा शहरात टिकणं सोपं नसतं, पण कृष्णा बापूंनी हार मानली नाही. कष्ट, संयम, आणि प्रामाणिकपणा या भांडवलावर त्यांनी राजकारणात हळूहळू आपलं कौशल्य सिद्ध केलं आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. अतिशय साधेपणा, प्रामाणिकपणा आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याची वृत्ती – हीच त्यांची खरी ओळख. मोठ्या शहरात राहूनही त्यांचा स्वभाव कधी बदलला नाही. आजही ते तितक्याच सहजतेने सामान्य माणसाशी बोलतात, त्याचं दुःख ऐकतात आणि शक्य तेवढी मदत करतात. कुठलाही गाजावाजा नाही, कुठलीही प्रसिद्धीची हाव ना...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – विशाल मनाच्या विशाल सरांना!

Image
🌟 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – विशाल मनाच्या विशाल सरांना! आजचा दिवस खास आहे... कारण आज जन्म झाला त्या व्यक्तीचा, ज्यांनी शिक्षणाला केवळ करिअर नव्हे तर संस्कारांचा उत्सव बनवला — देशभक्त करिअर अकॅडमी आणि स्वामी विवेकानंद कॉलेज चे संस्थापक आपले सर्वांचे लाडके विशाल खांडेकर सर! 🎉 शिक्षणाच्या माध्यमातून समाज बदलता येतो, ही गोष्ट ज्यांनी आपल्या आयुष्याचं ब्रीदवाक्य बनवलं, ते म्हणजे विशाल सर. त्यांच्या संस्थेतून शिकलेले अनेक विद्यार्थी आज राज्याच्या आणि केंद्राच्या विविध सरकारी सेवांमध्ये कार्यरत आहेत — हेच त्यांच्या कार्याचं खरं यश आणि अभिमान आहे. पण सर फक्त शिक्षक नाहीत, ते विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, मित्र आणि प्रेरणास्थान आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आत्मविश्वास जागवणं, संस्कारांची बीजे पेरणं आणि योग्य दिशेने मार्गदर्शन करणं — हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. मैत्रीच्या दुनियेतही विशाल सर हे नावच पुरेसं आहे. मित्रत्वाचं नातं जपताना ते नेहमीच प्रामाणिक, स्पष्टवक्ते आणि प्रत्येक गोष्टीची सखोल तपासणी करूनच मत मांडणारे आहेत. त्...

*सोंडोलीमध्ये रंगणार दोन महाराष्ट्र केसरींची तुफानी दंगल देवा थापा स्पर्धेचे खास आकर्षण*

Image
*सोंडोलीमध्ये रंगणार दोन महाराष्ट्र केसरींची तुफानी दंगल देवा थापा स्पर्धेचे खास आकर्षण* *मनोजकुमार मस्के, मांगरूळ*   श्री नायकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थ मंडळ सोंडोली (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) आणि रोज मर्क लिमिटेड, जाधव रोज मर्क स्पोर्ट्स प्रा. लि. तसेच एमिरेट्स होल्डिंग ग्रुप, दुबई यांच्या सौजन्याने सोमवार, दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य ‘रोज मर्क केसरी’ आणि ‘सोंडोली केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्ती रसिकांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण ठरणार असून दोन महाराष्ट्र केसरी पैलवानांमधील थरारक लढत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान हे स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार आहेत. या भव्य स्पर्धेचे आयोजन सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा. चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, नाईकबा यात्रा कमिटी (मुंबईकर) व ग्रामस्थ मंडळ, सोंडोली यांनी केले आहे. मुख्य कुस्ती: दोन महाराष्ट्र केसरी आमने-सामने, पहिल्या नंबरसाठीची मुख्य कुस्ती रोज मर्क लिमिटेड यांच्या सौजन्याने कै. मारुती सावंत (शेठ) आणि कै. मारुती पाटील (सेक्रेटरी) यांच्या स्मरणार्थ आयोजित केली आहे. या लढतीत पृथ्वीराज पाटील (म...

“लोकांशी संवाद – लोकशाहीचा उत्सव : शिराळ्यात आमदार सत्यजित देशमुख यांच्या आमसभेचा अर्थपूर्ण सोहळा”

Image
“लोकांशी संवाद – लोकशाहीचा उत्सव : शिराळ्यात आमदार सत्यजित देशमुख यांच्या आमसभेचा अर्थपूर्ण सोहळा” *मनोजकुमार मस्के, मांगरूळ* शिराळा तालुक्यातील जनतेसाठी मंगळवार दिवस हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव ठरला. शिराळा येथे आमदार सत्यजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि वरिष्ठ प्रशासनाच्या उपस्थितीत झालेल्या आमसभेने तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात एक वेगळं पान जोडून ठेवलं. तालुक्यातील विविध प्रश्न, शंका, अडचणी घेऊन आलेल्या नागरिकांनी ज्या आत्मविश्वासाने आपल्या समस्या मांडल्या, तीच लोकशाहीची खरी ताकद होती. विशेष म्हणजे – अनेकांना प्रशासकीय पद्धतींचा अभ्यास नसतानाही त्यांनी आपलं मन मोकळं केलं. आणि त्याला प्रतिसाद देताना आमदार देशमुख यांनी दाखवलेली संयमित, नम्र आणि मुद्देसूद उत्तरांची शैली, लोकांच्या मनात आणखी विश्वास निर्माण करून गेली. आमदार साहेबांच्या प्रत्येक उत्तरातून जाणवत होतं – ही केवळ राजकारणाची भाषा नव्हे, तर जनतेच्या मनाचा अभ्यास आहे. प्रत्येक प्रश्नाकडे त्यांनी केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहिलं नाही, तर त्या मागे असलेल्या माणसांच्या वेदना आ...

ती… माझं घरपण…

Image
ती… माझं घरपण… आयुष्य जगताना आपल्याला कोणी घडवतं, आपल्याला प्रेम देतं, आपल्यासाठी स्वतःला झिजवतं ते आपले आई-वडील— हे सगळं समजायला वेळ लागतो. पण एकदा हे लक्षात आलं की, त्या व्यक्तीकडे पाहताना डोळे नकळत भरून येतात…आपल्यावर कोणी प्रेम करत असेल तर ती व्यक्ती म्हणजे आपली धर्म पत्नी , बायको  २० एप्रिल २००६ रोजी ती माझ्या आयुष्यात आली. १९ वर्षांचा हा एकत्रचा प्रवास – सहज नव्हता. सुख होते, दु:ख होतं, परीक्षा होत्या… पण एका गोष्टीवर मात्र कधीच तक्रार नाही आली — तिच्या समर्पणावर, तिच्या निष्ठेवर माझ्या वडिलांच्या निधनानंतर, तीने संपूर्ण घराला आपलं घर मानलं. तिने माझ्या आईला "आई" म्हटलं ते मुखाने नव्हे तर मनाने. माझ्या भावांना आपले भाऊ मानलं, वहिनींना बहीण.  — कोणतेही नाटक नाही, कोणताही बनाव नाही… फक्त प्रामाणिक प्रेम आणि मनापासूनची आपुलकी. तीने कधीही स्वतःसाठी काही मागितलं नाही. कधी हट्ट नाही, कधी तक्रार नाही. *तिचं हसू हेच तिचं हत्यार* – *आणि तेच आमचं बळ*. कितीही कामाचा ताण असो, चेहरा कायम हसरा. घरात सर्वांशी ज्या पद्धतीने ती वागत आली आहे, ते पाहून मला जाणवलं –*माझं घर ...

*मोरेवाडी गावात उपसरपंचपदी संजय आकाराम कटके यांची बिनविरोध निवड*

Image
*मोरेवाडी गावात उपसरपंचपदी संजय आकाराम कटके यांची बिनविरोध निवड* *लोकशाही प्रक्रियेला चालना देणारी ऐतिहासिक निवड* मांगरूळ वार्ताहर  शिराळा तालुका येथील मोरेवाडी गावामध्ये नुकतीच उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले संजय आकाराम काटके यांची एकमताने उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड गावाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण मानली जात असून अनेक वर्षांनी ग्रामसभेच्या लोकशाही प्रक्रियेतून अशा पद्धतीची निवड पार पडली आहे. गावच्या विकासासाठी एकत्रित काम करण्याच्या उद्देशाने आणि गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर झालेल्या सहमतीनुसार, उपसरपंच पदाचा कार्यकाळ अडीच अडीच वर्षांचा ठेवण्यात आला होता. त्या अनुषंगाने, पहिल्या अडीच वर्षांसाठी संदीप दगडू सावंत यांनी उपसरपंच म्हणून काम पाहिले. आता उर्वरित कार्यकाळासाठी संजय काटके यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेसाठी गावाच्या सरपंच लक्ष्मी लक्ष्मण डिगे, माजी सरपंच आशोक डिगे उपसरपंच संदीप दगडू सावंत, इतर सर्व सदस्य, ग्रामसेवक, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, तसेच गावा...