Posts

Showing posts from July, 2025

*एक मल्लविकासाच्या युगाचा अंत – कै. पै. शिवाजी (भाऊ) कृष्णा जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली*

Image
*एक मल्लविकासाच्या युगाचा अंत – कै. पै. शिवाजी (भाऊ) कृष्णा जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली* मनोजकुमार मस्के, मांगरूळ कराड सांगली जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे, नवनवीन मल्ल घडवणारे आणि सामाजिक नेतृत्व करणारे कै. पै. * शिवाजी कृष्णा जाधव (भाऊ)* यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने रेड गावासह संपूर्ण कुस्ती विश्वावर शोककळा पसरली असून, ही केवळ एक व्यक्ती नाही, तर एक युग संपल्याची भावना सर्वत्र आहे. कै. जाधव हे * सांगली जिल्हा तालीम संघाचे जेष्ठ सदस्य , शिराळा तालुका तालीम संघाचे उपाध्यक्ष , रेड गावचे माजी उपसरपंच* तसेच * शिवछत्रपती तालीम संघाचे संस्थापक* होते. त्यांनी आपल्या कुशल मार्गदर्शनातून रेड गावात मल्लांची नवी पिढी घडवली. त्यांच्या शिस्तप्रिय व समर्पित वृत्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कुस्ती मैदानांवर रेड गावाचे मल्ल विजयी ठरले. त्यांचे योगदान केवळ कुस्ती क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. * निष्कलंक आणि निर्व्यसनी जीवनाचा आदर्श* ठेवून त्यांनी अनेक युवकांना फौजदार, पोलिस, व शासकीय सेवेकडे वळवले. समाजहितासाठी झटणारा, गावा...

वाटचाल एका दीपस्तंभाची – डी. वाय. एस. पी. दीपक कांबळे

Image
वाटचाल एका दीपस्तंभाची – डी. वाय. एस. पी. दीपक कांबळे मनोजकुमार मस्के, मांगरूळ गावाच्या मातीशी नातं जपणारा, हलाखीच्या परिस्थितीतून उभा राहून समाजात दीपस्तंभ ठरलेला अधिकारी म्हणजे डी. वाय. एस. पी. दीपक कांबळे . आज त्यांचा वाढदिवस, आणि हा दिवस म्हणजे केवळ एक शुभेच्छा देण्याचा नव्हे, तर त्यांच्या प्रेरणादायी वाटचालीचा गौरव करण्याचा एक सुवर्णक्षण आहे. सन 2009 साली दीपक कांबळे यांनी "अचाट पुस्तक" या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. शिक्षण हा मुलभूत हक्क असावा, ही भावना घेऊन त्यांनी पुढच्याच वर्षी "नालंदा अभ्यास केंद्र" या संकल्पनेचा जन्म घडवला. सुरुवातीला एका पडक्या इमारतीत, वीज नसताना मेणबत्तीत अभ्यास करणाऱ्या काही जिद्दी विद्यार्थ्यांपासून सुरुवात झालेली ही चळवळ, आज मंगरूळ गावात शिक्षणाचा मजबूत वटवृक्ष बनून उभी आहे. नालंदा अभ्यास केंद्र हे केवळ अभ्यासाचे ठिकाण नव्हते, तर स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची ऊर्जा देणारे एक विद्यास्थान ठरले. दीपक कांबळे यांनी गावातील मुला-मुलींमध्ये अधिकारी होण्याची उमेद जागवली. त्यांच्या प्रयत्नांनी गावातील अनेक विद्या...

*बत्तीशिराळची नागपंचमी 23 वर्षांनंतर पूर्वपथावर; नवनिर्वाचित आमदार सत्यजित देशमुख यांचा सिंहाचा वाटाकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळला; शिराळ्यात जल्लोष, अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू*

Image
*बत्तीशिराळची नागपंचमी 23 वर्षांनंतर पूर्वपथावर; नवनिर्वाचित आमदार सत्यजित देशमुख यांचा सिंहाचा वाटा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळला; शिराळ्यात जल्लोष, अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू* *मनोजकुमार मस्के, मांगरूळ* शिराळ्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेली नागपंचमी यात्रा तब्बल 23 वर्षांनंतर पुन्हा पूर्वपथावर आली असून, यामध्ये नवनिर्वाचित आमदार सत्यजित देशमुख यांचा मोलाचा वाटा ठरला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिराळा दौऱ्यात शिराळकरांना दिलेला शब्द पाळत या पारंपरिक सणाच्या पुनरुज्जीवनाला मान्यता दिली आणि त्यानंतर सर्व पातळ्यांवर हालचाली गतीमान झाल्या. नागपंचमीसारखा श्रद्धेचा सण गेल्या दोन दशकांहून अधिक काळ विस्कळीत राहिला होता. परंतु यंदा, सत्यजित देशमुख आमदारपदावर निवडून आल्यानंतर त्यांनी हा विषय प्राधान्याने घेतला. त्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवत शासनस्तरावर पाठपुरावा केला आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून सण पुन्हा मूळ स्वरूपात साजरा होईल याची व्यवस्था केली. यात्रेच्या दिवशी शिराळा गावात उत्सवाचे मोठे वातावरण होते. नागपूजन, ...

*"कुस्ती हेच जीवन" या चळवळीचे धडाडीचे नेतृत्व – रामदास देसाई सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा*!

Image
*"कुस्ती हेच जीवन" या चळवळीचे धडाडीचे नेतृत्व – रामदास देसाई सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा*! *लेखन – मनोज मस्के, पत्रकार, दै. पुण्यनगरी* काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की त्यांच्याशी एकदा संवाद झाला, की आपल्या आयुष्यातील  भावना, गुपितं, मनातली घुसमट त्यांच्या समोर सहज व्यक्त होते. ते ऐकतातही मनापासून आणि शब्दही देतात — "मी आहे ना रे सोबत..." असंच एक दिलदार, समर्पित आणि कुस्तीला आयुष्य मानून चालणारं नाव म्हणजे मा. रामदास देसाई सर – "कुस्ती हेच जीवन" या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. *उगम एका छोट्या रोपट्याचा*... सन २०१७ मध्ये ‘फेसबुक पेज’च्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ – "कुस्ती हेच जीवन" – केवळ एक डिजिटल उपक्रम नव्हता, तर मातीशी नाळ जोडलेल्या आणि देशभरातल्या कुस्तीप्रेमींना एकत्र आणणारा आत्मीय प्रयत्न होता. पैलवानांचे प्रशिक्षण, खुराक, लढतींचे व्हिडीओ, कुस्ती संस्कृतीची माहिती या माध्यमातून भारतातच नव्हे, तर परदेशातही पोहोचवली गेली. आज त्याच छोट्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे – पेजवर ५०,००० पेक्षा अधिक फॉलोअर्स हे याचेच प्रती...

हुतात्म्यांची स्मारके धोकादायक अवस्थेत – ९ ऑगस्टला ध्वजारोहण की नवसंजीवनी?

Image
हुतात्म्यांची स्मारके धोकादायक अवस्थेत – ९ ऑगस्टला ध्वजारोहण की नवसंजीवनी? शिराळा तालुक्यातील इतिहासाला साजेसा सन्मान कधी मिळणार? मनोजकुमार मस्के मांगरुळ  : 890291065 शिराळा तालुका महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात येथील असंख्य क्रांतिकारकांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. या हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात आलेली स्मारके आज मात्र दुर्लक्षित, मोडकळीस आलेली आणि धोकादायक अवस्थेत उभी आहेत. विशेषतः मांगरुळ गावातील दोन हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेले स्मारक — जिथे दरवर्षी ९ ऑगस्टला ‘क्रांती दिना’निमित्त ध्वजारोहण होते — ते स्मारक सध्या जीर्ण, तडे गेलेले असून त्यावर उभारलेली क्रांतीज्योत कोणत्याही क्षणी कोसळू शकते. या स्मारकाभोवतीची संरक्षक भिंतदेखील पडलेली आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष – स्मारके धोकादायक स्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याचा कारभार सुरु असतानाही, शिराळा तालुक्यातील ऐतिहासिक स्मारकांकडे ना प्रशासनाचे, ना स्थानिक स्वराज्य संस्थांचे लक्...

शित्तूरच्या आनंदराव पाटलांनी गॅरेज व्यवसायातून यशस्वी उद्योजकतेचा घडवला आदर्श प्रवास*

Image
"*कोण म्हणतं मराठी तरुण उद्योगात यशस्वी होत नाही*?" *शित्तूरच्या आनंदराव पाटलांनी गॅरेज व्यवसायातून यशस्वी उद्योजकतेचा घडवला आदर्श प्रवास* *वाढदिवसानिमित्त मित्रासाठी खास लेख*  🖊️ *मनोजकुमार मस्के, मांगरूळ* "कोण म्हणतं मराठी तरुण उद्योगात यशस्वी होत नाही?" – हे विधान खोडून काढले आहे शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर गावचे सुपुत्र मा. आनंदराव पाटील यांनी. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, वडील शेतकरी, शिक्षण अपुरं... पण मेहनतीवर आणि प्रामाणिकपणावर अपार विश्वास ठेऊन त्यांनी निर्माण केला यशाचा नवा प्रवास. *गावाकडून शेडगेवाडीकडे – एक यशोगाथा* शित्तूरसारख्या छोट्याशा खेड्यात जन्मलेले आनंदराव पाटील यांनी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे मोटरसायकल दुरुस्ती गॅरेज सुरू करून आपल्या उद्योजकीय वाटचालीची सुरुवात केली. सुरुवातीला हाताशी मोठं भांडवल नव्हतं, पण मनात प्रचंड आत्मविश्वास होता. प्रामाणिक काम, गोड बोलणं आणि ग्राहक सेवा – या तीन गोष्टींवर त्यांनी ग्राहकांची मने जिंकली *गॅरेज ते शोरूम – यशाचा टप्पा* उत्कृष्ट सेवा आणि नावारूपाला आलेल्या व्यवसायामुळे काही वर्षांतच त्य...

क्रांतीभूमी मांगरूळ ग्रामस्थ आयोजितव देशभक्त अकॅडमी, विवेकानंद ज्युनिअर कॉलेज यांच्या सौजन्याने*

Image
🌹🇮🇳 *क्रांतीभूमी मांगरूळ ग्रामस्थ आयोजित व देशभक्त अकॅडमी, विवेकानंद ज्युनिअर कॉलेज यांच्या सौजन्याने* ✨ *नवक्रांती पर्व व्याख्यानमाला* ✨ (क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन) वर्ष - १ ले 📍 *स्थळ: मा. कै. पी. बी. खांडेकर (आण्णा) विचारमंच हॉल, देशभक्त अकॅडमी, मांगरूळ* 🕕 वेळ: सायंकाळी 6.00 ते 8.0 💐 *पुष्पमाला कार्यक्रम* 💐 📖 *पुष्प पहिले* शनिवार, 9 ऑगस्ट 2025 🎤 "मी ज्योतिराव फुले बोलतोय" 🗣️ मा. प्रदीप बनसोडे 🩺 *पुष्प दुसरे* रविवार, 10 ऑगस्ट 2025 🎤 "वैयक्तिक व सामाजिक आरोग्य" 🗣️ डॉ. कालिदास पाटील, इस्लामपूर 🔬 *पुष्प तिसरे* सोमवार, 11 ऑगस्ट 2025 🎤 "विज्ञानवादी दृष्टिकोन - काळाची गरज" 🗣️ मा. प्रा. किशोर गावडे (बाबा नाईक कॉलेज, कोकरूड) 🇮🇳 *पुष्प चौथे* मंगळवार, 12 ऑगस्ट 2025 🎤 "स्वातंत्र्य चळवळ - ज्वाज्वल ऐतिहासिक ठेवा" 🗣️ मा. रवींद्र काका बर्डे, वाटेगाव 🙏 *पुष्प पाचवे* बुधवार, 13 ऑगस्ट 2025 🎤 "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" 🗣️ मान. प्रा. संजय बनसोडे सर (प्रदेश सचिव, अ.नि.स.) 🌱 *पुष्प सहावे* गुरुवार, 14 ऑगस्ट 2025 🎤 ...

ऑलिंपिक वीर बंडा पाटील रेठरेकर – शासनाच्या दुर्लक्षामुळे सुविधांपासून वंचित, मातीचा मल्ल विस्मृतीत?

Image
ऑलिंपिक वीर बंडा पाटील रेठरेकर – शासनाच्या दुर्लक्षामुळे सुविधांपासून वंचित, मातीचा मल्ल विस्मृतीत? ✍️ मनोजकुमार मस्के, मांगरूळ ज्यांनी भारताला आंतरराष्ट्रीय मैदानावर ओळख मिळवून दिली…ते 1964  चे ऑलम्पिक वीर बंडा पाटील रेठरेकर मामा कोल्हापूर जिल्हा शाहुवाडी तालुक्यातील रेठरे वारणा या लहानशा खेड्यातून उभा राहिलेला एक असामान्य मल्ल – बंडा पाटील रेठरेकर. कुस्तीच्या मैदानात त्यांनी घेतलेली झेप थेट ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत पोहोचली होती. भारतात फारच थोडे मल्ल असे आहेत, जे ग्रामीण पार्श्वभूमीवरून येऊन ऑलिंपिकसारख्या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत उतरले. पण दुर्दैवाने, ज्या मातीने या मल्लाला घडवलं, त्याच मातीत आज तो शासनाच्या दुर्लक्षामुळे झाकोळला गेलाय. शासनाची पाठ फिरली, ना सन्मान ना सुविधा बंडा पाटील यांनी देशासाठी खेळताना स्वतःच्या आयुष्याचे सोने केले. पण त्याच्या बदल्यात त्यांना मिळालं ते फक्त खांद्यावरून उतरलेलं गौरवाचं ओझं आणि विस्मरण. आजही त्यांच्या नावाने ना कोणी खेळ प्रशिक्षण केंद्र आहे, ना कुठला कुस्ती आखाडा आहे, ना कुठला सरकारी गौरव पुरस्कार त्यांच्या योग्य त्या दर्ज...

भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्यपदी पाडळेवाडीचे कृष्णा पाटील यांची नियुक्ती.

Image
भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्यपदी पाडळेवाडीचे कृष्णा पाटील यांची नियुक्ती  मांगरूळ, वार्ताहर: शिराळा तालुक्यातील पाडळेवाडी गावचे सुपुत्र, सध्या मुंबईतील घणसोली येथील रहिवासी आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच माजी महामंत्री कृष्णा बापू पाटील यांची भाजप महाराष्ट्र राज्य परिषदेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या भाजप राज्य परिषदेच्या ४५४ सदस्यांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे. या नियुक्तीनंतर पाटील यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, भाजपचे पदाधिकारी गणेश सकपाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते अभिजीत पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. राजकारणात १५ वर्षांची निष्ठावान सेवा कृष्णा पाटील हे मागील १५ वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असून, संघटनेच्या विविध पदांवर त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या पत्नीही भाजपच्या तिकिटावर निवडून नगरसेविका झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात रात्र निवारा केंद्र, ग्रंथालय, नागरी आरोग्य केंद्र अशा मूलभूत सुविधांची उभारणी करण्यात आली, ज्याचा थेट फायदा सामान्य जनतेला झाला. सामाजिक...

आमदार शिवाजीराव नाईक – राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेश उपाध्यक्ष

Image
📰 आमदार शिवाजीराव नाईक – राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेश उपाध्यक्ष मनोजकुमार मस्के, मांगरूळ  महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी घडामोड झाली आहे. शिराळा मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव यशवंतराव नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड केवळ पक्षीय राजकारणापुरती मर्यादित नसून, पश्चिम महाराष्ट्रातील आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांसाठी एक मोठा संकेत मानला जात आहे. 🎓 शिवाजीराव नाईक यांचा राजकीय अनुभव – शिवाजीराव नाईक यांचे वडील यशवंतराव  नाईक नेहमीच सामाजिक कार्यात सक्रीय होते. शिवाजीराव नाईक यांचे शिक्षण: बी.एस्सी. (केमिस्ट्री),1968 ला शिवाजी विद्यापीठ येथून घेण्यात आले. राजकारणाची पहिल्यापासून आवड त्यात घरातूनच समाजकार्याचे धडे मिळाल्याने लोकांशी संवाद साधने आणि तो टिकवणे या गोष्टी वडिलांच्याकडूनच शिकता आल्या.  शिवाजीराव नाईक यांनी 1995 मध्ये अपक्ष म्हणून आपली राजकीय सुरुवात केली आणि अवघ्या काही वर्षांतच त्यांची ओळख एक स्वच्छ आणि बिनधास्त वक्ते नेते म्हणू...

विरोधी पक्षनेत्याला दर्जा द्यायलाच हवा पण... महाराष्ट्राचे राजकारण कधी ‘दर्जदार’ होणार?

Image
विरोधी पक्षनेत्याला दर्जा द्यायलाच हवा पण... महाराष्ट्राचे राजकारण कधी ‘दर्जदार’ होणार? - मधुकर भावे १ जुलै २०२५ च्या दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये आमदार जयंतराव पाटील यांनी एका चांगल्या मुद्याची चर्चा करणारा लेख लिहिला आहे. सभागृहात विषय मांडल्यानंतर, अध्यक्ष निर्णय देत नाहीत, म्हणून कदाचित ते वृत्तपत्रांकडे गेले असावेत... वास्तविक विधान मंडळाचे वृत्तसंकलन करणाऱ्या वृत्तपत्रांनी या विषयांवर महाराष्ट्राच्या ६५ वर्षांचा सगळा तपशील प्रभावीपणे व्यक्त करायला हवा होता. लोकशाहीमध्ये ‘सत्ताधारी आणि विरोधी’ आमदार हे सभागृहात सम-समान आहेत. त्यात भेद करता येत नाही. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांएवढाच विरोधी पक्ष आवश्यकही आहे  आणि तो विरोधी पक्ष कमी-जास्त प्रमाणात असला तरी, त्याचा धाक सत्ताधाऱ्यांना असतो... हे महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षाने हजारवेळा सिद्ध करून दाखवले आहे. १९६७ साली सत्ताधारी बाकावर काँग्रेसचे २०२ आमदार होते. १९७२ साली २०२ चे २२२ झाले. समोरचा विरोधी पक्ष संख्येने दुबळा होता...पण गुणवत्तेमध्ये एवढा तगडा होता की, २२२ आमदारांना घ्ााम फुटायचा... सरकारची दमछाक व...