Posts

सुसंस्कृत नेतृत्व विजय पाटील मांगले गावचे सुपुत्र उच्च शिक्षित शांत व संयमी सामान्य माणसाबद्दल आपुलकी व मदत करायची भावना असणारे उदयोन्मुख नेतृत्व म्हणजे विजय पाटील (आबा )

Image
सुसंस्कृत नेतृत्व विजय पाटील मांगले गावचे सुपुत्र उच्च शिक्षित  शांत व संयमी सामान्य माणसाबद्दल आपुलकी व मदत करायची भावना असणारे उदयोन्मुख नेतृत्व म्हणजे   विजय पाटील (आबा )होय                     राजकारण समाजकारण उद्योग व्यवसाय सार्वजनिक क्षेत्रात    समाजाचा आरसा व कष्ट धडपड ध्येय वेडे व्होऊन  ग्रामदैवत श्री मंगलनाथाचा आर्शिवाद व पुण्याईची शिदोरी बरोबर घेऊन आबांची सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती ची घोडदौड सुरु आहे.  यश उतुंग डोंगराएवढे प्राप्त केले तरी माणुसकीची साखळी पर्वताएवढी आहे .           स्वच्छ चेहरा निर्व्यसनी पण जिद्दी असणाऱ्या आबांनी मांगले गावचे सरपंच म्हणून एक वर्षाच्या कालावधीत गाव विकासासाठी सहकाऱ्यांच्या व माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक साहेबांच्या  माध्यमातून भरीव योगदान देऊन  आदर्श  सरपंच म्हणून काम केले आहे . कोरोना काळात आर्सेनिक अलबम औषधी गोळ्या मोफत वाटप केल्या. त्याचबरोबर आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना माणसिक आधार देऊन आर्थिक...

अनेक बहिणी आपल्या भावांना ज्ञानाचे भांडार म्हणून पुण्यनगरीचा दिवाळी अंक भेट दिला

Image
चिखली:-  मनोजकुमार मस्के आजची भाऊबीज ही कपडे, मिठाई यांच्या व्यतिरिक्त अनेक बहिणींनी आपल्या भावाला पुण्यनगरीचा दिवाळी अंक भेट देऊन साजरी केली. हा दिवाळी अंक भेट देण्याच्या मागचा उद्देश कपडे मिठाई, कधी ना कधीतरी संपणार आहे. परंतु या अंकातले लेख असतील, विचार असतील हे आयुष्यभर सोबत राहणार आहेत म्हणून अनेक बहिणींनी कपडे आणि मिठाई बाजूला सारून पुण्यनगरीचा दिवाळी अंक भेट देणे अधिक पसंत केले. यावर्षी कोरोणाचे सावट असल्याने. दिवाळीसारखा  सण आला कधी गेला कधी कळलच नाही. तसा यावर्षी उत्साह फार कमीच पाहायला मिळाला. बघता बघता दिवाळी संपली आणि भाऊबीज आली.                  कार्तिक शुद्ध द्वितीया भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते त्याची आयुष्य मागते. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेला व नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस 'भाऊबीज' म्हणून साजरा केला जातो.        ...

ग्रामीण भागातील शेतकरी दिवाळी करणार तरी कशी, आणि कर्ज काढून केलेली दिवाळी गोड लागणार तरी कशी.

Image
चिखली:- मनोजकुमार मस्के सध्या दिवाळीची धामधूम असली तरी शहरी भागात खरेदी करणारांची  गर्दी दिसत आहे.  ग्रामीण भाग मात्र ओस पडलेली दिसत आहेत. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील दिवाळी ही दिवाळखोरीत  निघाली असल्याचे चित्र कुठेतरी दिसत आहे.  संपूर्ण बाजारपेठा खाली खाली दिसत असल्याने. अनेक व्यापाऱ्यांनी जेमतेमच आपल्या दुकानात माल भरला आहे. बाजारपेठेत गिऱ्हाईक नसल्याने त्यांचाही धंदा आतभट्यात आला आहे. ग्रामीण भागात दिवाळीची खरेदी धीमी गतीने असली तरी  शहरे मात्र गजबजलेली आहेत. त्याचबरोबर या वर्षीची दिवाळी काहींच्या घरी फूलुन आहे तर काहींच्या घरी मलीन आहे.       शेतकऱ्याचा गेल्या वर्षी महापुराने, यावर्षी कोरोनाने जीव घेतला. त्यातून कुठेतरी पीक चांगले आले होते त्यात पावसाने सगळं काही बुडवलं. सरकारची मदत अजून कागदावरच आहे. आणि जरी ती खात्यात आली तरी ती तुटपुंजी असणार आहे. गेल्या वर्षीच्या कर्जाचा बोजा अजून शेतकऱ्याच्या माथी तसाच आहे. ज्यांना पगार मिळतो, ज्यांचा धंदा चालतो त्यांना दिवाळी चांगली जाणार हे जरी खरं असलं तरी दुसरीकडे  ज्यांना घराब...

महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा व आमदार निवास व्यवस्था समितीवर आमदार मानसिंगराव नाईक यांची सदस्य म्हणून निवड झाली

Image
शिराळा  : महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा व आमदार निवास व्यवस्था समितीवर आमदार मानसिंगराव नाईक यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या आहेत.  या समिती बाबत माहिती देताना आमदार नाईक म्हणाले, लोकलेखा समिती ही राज्य विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त समिती आहे. विधिमंडळाच्या कामकाजात या समितीचे विशेष महत्त्व आहे. राज्याचे विनियोजन लेखे व नियंत्रक तसेच महालेखापरीक्षकांचा अहवाल यांचे परीनिरीक्षण करणे. राज्य सरकारच्या वित्तीय लेख्यांचे व त्यावरील लेखा परीक्षा अहवालाचे परिनिरीक्षण करणे. राज्याची महामंडळे, व्यापारविषयक व उत्पादनविषयक योजना आणि प्रकल्प यांचे उत्पन्न व खर्च दाखवणारी लेखा विवरणे तसेच एखादे विशिष्ट महामंडळ, व्यापारी संस्था किंवा प्रकल्प यांना भांडवल पुरविण्यासंदर्भात नियमन करणाऱ्या वैधानिक नियमांच्या तरतुदीअन्वये तयार केलेला ताळेबंद व नफा-तोट्याच्या लेख्यांची विवरणे व त्यावरील नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा अहवाल तपासणे.  राज्यपालांनी कोणत्याही जमा रकमांची लेखा परीक्षा करण्याबाबत किंवा साठा व मालासंबंधीचे लेखे तपासण्याबाबत नियं...

जगाचा पोसिंदा अडचणीत आहे.किमान पंचनामे तरी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करा.

Image
जगाचा पोसिंदा अडचणीत आहे. किमान पंचनामे तरी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करा.  मनोजकुमार मस्के बघता बघता वर्ष संपत आले. जन्मभर विसरता येणार नाही असं हे वर्ष होते. २०२०  या वर्षांत जनता घाबरली. संपूर्ण जग शांत होते. शेतकर्यांनी धान्याची, पैसेवाल्यांनी पैश्याची मिळेल ती मदत  केली. पैपाहुणे ऐकमेकाकडे येणे बंद झाले. सरकारने रेशनच्या माध्यमातून प्रत्येकाला धान्य पुरविले अनेकांच्या पोटाचा प्रश्न संपला असला तरी या संपूर्ण महामारीत पुरता मेला तो शेतकरी, कारण पेरणीपूर्वी महामारीचे सावट, पेरणीनंतर लाॅकडाउनमुळे अंतर मशागत करण्यास मजुरांची टंचाई, पिक काढणिच्या वेळी पावसाने झोडपले, आणि त्यातुन काही उरलेसुरलेले धान्य  शेतातुन  काढण्यासाठी रोजगारी मिळत नसल्याने शेतकरी पुरता बेजार झाला असल्याचे चित्र ग्रामीणभागात दिसत आहे.            रोजंदारी करणाऱ्यांची संख्या खुपचं कमी झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना एकत्र येऊन पैरा पद्धत करूनच पिकांची पेरणी आणी काढणी करावी लागत आहे.    तंत्रज्ञानाचा वापर झाला खरा पण या तंत्रज्ञानाने माणूस...

*मा भिमराव (उर्फ) राहुल पाटील वाढदिवस विशेष*.

Image
*मा भिमराव (उर्फ) राहुल पाटील वाढदिवस विशेष*. शिराळा तालुक्यातील तडवळे गावचे सुपुत्र मा भिमराव पाटील यांचा आज वाढदिवस  भिमराव यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण गावातच झाले, आणि उच्च शिक्षण शिराळा येथे पुर्ण झाले  खरं सांगायचं झालं तर भिमराव पाटील यांची घरची परिस्थिती तशी जेमतेमच पण , लहानपणापासून भिमराव पाटील यांचा मित्र समुह तसा मोठाच. या मित्र परिवारात त्यांना एक सवय मात्र लागली ती म्हणजे सामाजिक बांधिलकीची. गावातील कोणतेही सामाजिक काम असो ते अगदी हसतमुखाने करत.गावात राहुन गावाची सेवा करायची ही त्यांची मनोमन ईच्छा असायची, पण पोटाचा प्रश्न निर्माण व्हायला लागला, गावात तालीम नाही की व्यायाम शाळा नाही, पण लाल मातीवर प्रेम मात्र भारी. गावातील जत्रेत मात्र पुढे होऊन काम करण्याची  त्यांची सवय मात्र आजही कायम आहे. पोटासाठी गाव सोडावे लागले. मुंबईत छोटे मोठे काम करत गावासाठी काय करता येईल का हा त्यांचा मनोमन विचार असायचा, सुरवातीला हा माणुस भाजी मार्केट मध्ये काम करणारा आज एका भायखळा मुंबई सारख्या शहरात भाजी मार्केटमध्ये मोठा व्यापारी आहे, हे सर्व करत असताना शिराळा वा...

*_महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून जडण-घडणेचे साक्षीदार महाराष्ट्राचा ज्ञानकोष, ज्येष्ठ विचारवंत, संपादक व पत्रकार मधुकर भावे यांचा 9 ऑक्टोबर हा जन्मदिवस. आज ते 82 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.त्यांना आई तुळजा भवानी व साई बाबा उदंड आरोग्यदायी आयुष्य देवो.

Image
*_महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून जडण-घडणेचे साक्षीदार महाराष्ट्राचा ज्ञानकोष, ज्येष्ठ विचारवंत, संपादक व पत्रकार मधुकर भावे यांचा 9 ऑक्टोबर हा जन्मदिवस. आज ते 82 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.त्यांना आई तुळजा भवानी व साई बाबा उदंड आरोग्यदायी आयुष्य देवो.भावे सरांना त्यांच्या बाबतीत कोणी लिहलेले आवडत नाही.त्यांच्यावर लिहण्या एवढी माजी उंचीही नाही.तरी ही त्यांच्या सहवासातून मला अनुभवता आलेले भावे सर त्यांची पुर्व परवानगी न घेता लिहण्याचा हा टोकडा प्रयत्न.सर माफ करा..._* *'भाव'लेले भावे सर!* *"होय मी भावे आहे!जरुर पण पु.भा.भावेंच्या नव्हे तर विनोबा भावेंच्या कुळीतील.आणि ते व्रत शेवटपर्यंत जपेन'* असे व्यासपीठावरुन ठणकावून सांगणारे मधुकर भावे सर पाहिले की कुठला जातीयवाद मनात येत नाही त्याचा स्पर्शही जाणवत नाही. आजच्या म्हणजे जातीय विभाजनाच्या काळात तर त्यांचं हे व्यक्तीमत्व अधिकच उठून दिसतं. व्यासपीठावर भावे सर कुठंही असले तरी त्याचं अस्तित्व उजळून येण कुणाला नाकारता येत नाही. महाराष्ट्रातला कोणताही राजकारणी त्यांना टाळू शकत नाही. उलट त्यांचा सल्ला घेतो. वयो...