Posts

शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे सुपुत्र *मा दिलीप कुंभार यांचा आज वाढदिवस*

Image
*वाढदिवस एका मुर्तीकाराचा* ..... ......................  ✍ *पै अशोक सावंत/पाटील* - सोंडोलीकर शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे सुपुत्र  *मा दिलीप कुंभार यांचा आज वाढदिवस*  ‌दिलीप कुंभार यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला अनेक दशके गरीबीत असणारे हे कुटुंब त्यांचे वडील *आनंदा (पोपट) कुंभार आपल्या गणपती मुर्ती*  *बनविण्याच्या कौशल्यावर, त्यातुन मिळेल त्या तुटपुंज्या कमाई वर आपला संसाराचा गाडा चालवत होते*, सर्व काही ठिक चालले असताना काळाला याची पर्वा कुठे, आळवावरचा पाण्याचा थेंब कसा अलगद जावा तसा आनंदा  कुंभार नावाचा एक प्रसिद्ध मुर्तीकार देवाने उचलून नेला, आणि एका हाडाच्या मुर्तीकाराला दिलीप पोरका झाला  या हाडाच्या मुर्तीकारामुर्तीकाराचा मी स्वतः अनुभवलेला किस्सा (आठवण) सांगतो २९ वर्षापुर्वीची गोष्ट..आमचं एक छोटे दुर्गामाता मंडळ होते आम्ही दुर्गामातेची मुर्ती शाहुवाडी तालुक्यातील कापशी या गावात मुर्ती ठरवली आणि घटस्थापनेच्या दिवशी मंडळातील काही कार्यकर्ते मुर्ती आणण्यासाठी गेलो असता आम्हाला त्याठिकाणी मुर्ती मिळाली नाही आम्ही हताश होऊन घरी परतलो आण...

मधुकर भावे उत्तर-दक्षिण

Image
उध्दवसाहेब, नवा चार्तुवर्ण, नवा वसाहतवाद निर्माण करु नका! मधुकर भावे उत्तर-दक्षिण ‘राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं’  तर तक्रार कोणाकडे करायची? असं पुर्वीच्या काळी म्हटल जात असे. राजाच्या हातात अर्निबंध सत्ता होती, राजा हुकूमशहाच होता, लोकांना आवाज नव्हता. पावसाने झोडपल्यावर तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्नचा होता. आता लोकशाहीच्या काळात पावसाने झोडपलं तर, तक्रार करता येणार नाही हे खरं आहे. पण नुकसान झालं तर मदत मागता येण्याची व्यवस्था आहे.  राजानं मारण्याचे दिवस संपलेले आहेत, राजे संपले, पण राज्यकर्त्यांनी चुकीचे निर्णय केले तर, त्या विरोधात खणखणीतपणे ‘राज्यकर्त्याला तु चुकतो आहेस’ हे सांगायची वेळ आलेली आहे. गेल्या ६ महिन्यात उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. कोरोनाच्या संकटानंतर गेल्या ९० दिवसात सामान्य लोकांनी जे सहन केले आहे त्याबद्दल कोणी तक्रार केलेली नाही. लोक अर्धपोटी आहेत, उपाशी आहेत, काम नाही. कामावर जायला वाहतुकीची साधनं नाहीत. ९० दिवसानंतर मुंबईची प्राणवाहिनी लोकल सुरु झाली. सामान्य माणसाला एवढं हायसं वाटलं होतं. ...

आईवडीलांनी रोजगार करून पोराला आणि आजीने भाजी विकुन नातवाला शिकवले

Image
शिराळाः-  मनोजकुमार मस्के 9890291065 लोकांची घरे उभा करत असताना आपले छप्पर मात्र उघडे राहिले. दगडावर दगड रचत बांधलेल्या भिंती माझ्या बापाप्रमाणेच मजबुत होत्या. उन वारा पाऊस याचा सामना करत माझा बाप अनेकांची घरे उभा करत होता. मिळेल ते पोटालाच लागत होते. घरची परिस्थिती हालाकीची आई दुसर्‍याच्या शेतावर रोजंदारी करी आणि त्या पैशावर आमचं कुटूंब चाले. असे उदगार सध्याचे उपशिक्षण अधिकारी आणि नुकतीच डी.वाय.एस.पी पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेले अमरसिंग मानसिंग मोहिते यांनी काढले.        नागज ता. कवठेमहंकाळ येथील मराठी शाळेत अमर यांचे 7 वी पर्यंत शिक्षण झाले. अमर मोहिते यांचे वडील गवंडी काम करत असत. आणि त्यातून मिळणार्‍या तुटपुंज्या रकमेवर आपला घरखर्च भागवत असत. आपल्या बापाच्या हाताचे फोड अमर बघत असे त्या फोडांच्या वेदना अमरला असाह्य हात असे.  अमरला ही परिस्थिती बदलायची होती. गरीबीची जाण आणि जिद्दीने महान असणारे अमर मोहिते हे लहानपणापासून अभ्यासात हुशार होते. वडिलांचे अपार कष्ट एकीकडे चालू होते आणि दुसरीकडे अमर यांची अभ्यासातील घोडदौड. पण नियातीला हे मान्...

नाना अचानक जाण्याने संपुर्ण मित्रपरीवाराला व त्यांच्या कुटूंबाला तसेच हितचिंतकांना मोठा धक्का बसला हे मात्र खरे

Image
मांगरुळ  गावचे  प्रतिष्ठित नागरिक  आणि  श्री  अभिजित मस्के तलाठी आण्णासाहेब शिराळा  यांचे  वडील  श्री  लक्ष्मण  साधू  मस्के  यांचे आज आकस्मिक निधन झाले . नुकतेच सेवानिवृत्त होऊन ते आपल्या मुळ गावी मांगरूळला राहत होते. दोन दिवसापुर्वी त्यांच्या मुलांनी आई - वडीलांच्या  लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. अतिशय सुखी   आसणार्या या कुटुंबावर जणु दुख्खाचा डोंगर कोसळला.           अतिशय मेहतीने त्यानी आपला संसार ऊभा केला. चार मुलांचे शिक्षण पुर्ण केले. मोठी मुलगी ग्रामसेवक झाली छोटा मुलगा तलाठी झाला. एक मुलगा mpsc चा आभ्यास करत आहे. मुलींची लग्न झाली असून त्यांच्या घरी त्या सुखात आहेत. मुलांची आजुन लग्न करणे बाकी होते  तोपर्यंत हा काळाने घाला घातला .  संपुर्ण आयुष्य कुटुंबासाठी ते झटत राहीले . आत्ता कुठे बसुन खायचे दिवस आले तो पर्यंत नियतीने कानाडोळा केला. आणि आयुष्याचं गणितच बदलुन टाकले.  शेवटी परमेश्वराच्या नियतीपुढे कोणाचे चालत नसते.  जे ठरलेले असते तेच घडते....

राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन

*ब्रेकिंग *राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन* *- ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती* *उपसरपंचांच्या खात्यावर पहिल्यांदाच १५.७२ कोटी रुपये जमा* शिराळा-  : राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते, त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. पण आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात १५.७२ कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील गावांच्या विकासासाठी सरपंचांबरोबर उपसरपंचांचेही मोठे योगदान असते. सध्या राज्यातील सरपंचांना दरमहा मानधन मिळत आहे. पण गावाच्या विकासासाठी असलेले उपसरपंचांचे योगदान लक्षात घेऊन त्यांनाही मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक कारणास्तव आतापर्यंत त्यांना मानधन अदा करण्यात आले नव्हते. आता यासंदर्भातील लेखाशिर्ष तयार करणे, मानधन ऑनलाईन अदा करण्याची कार्यप्रणाली तयार करण...

कर्तुत्ववान नेता मानसिंग भाऊ

Image
महाराष्ट्रातील सर्व राजकिय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते ज्या नेत्यापुढेे आज आदराने झुकतात, नम्र होतात असे महाराष्ट्राचे आजचे सर्वश्रेष्ठ नेते दाखवता येतील यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्रात सर्वसामान्यांचा नेता म्हणून शरद पवार साहेब हेच सर्वश्रेष्ठ आहेत.  आशा या थोर नेत्याच्या हाताखाली शिराळा तालुक्यातील मानसिंगराव नाईक हा एक छोटा नेता. पक्षाचं काम करत आहे. किंबहुना शिराळ्याच्या राजकारणात मानसिंग नाईक (भाऊ) यांच्या एवढा समतोल विचाराचा दुसरा नेताच नाही. आप्पांच्यां निधनानंतर राजकारणाचा फारसा अनुभव नसताना प्रचंड जिद्द, प्रचंड अत्मविश्वास, धगधगती राष्ट्रभक्ती आणि अफाट असे व्यवहार ज्ञान या जोरावर भाऊं नी शिराळा तालुक्यात उणिपूरी आपला प्रभाव निर्माण केला. तो टिकीवला आणि वाढीवला शिराळा तालुक्यात असे एक ही क्षेत्र नाही की ज्या विषयाची भाऊंना माहिती नाही. आणि तालुक्यात एक ही गांव नाही की ज्या गावातील पन्नास- साठ कार्यकर्त्यांना भाऊ ओळखत नाहीत. नेत्यात सर्वात मोठा गुण हवा तो कार्यकर्त्यांना नावाने ओळखण्याचा, कार्यकर्ता कधीही आला तरी त्याचे म्हाणने ऐकून घेण्याचा भाऊं च्या मध्ये हे सगळे ...

"स्मशानातील सोनं.."

Image
"स्मशानातील सोनं.." इ. १०वी मध्ये हा धडा कोणी-कोणी वाचलाय  आठवतो का ?  ---------------------------------- शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमान ताडकन उङी मारली.त्याला समाधानाचं भरत आलं.आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला.त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनी प्रमाणे ओबड धोबड दिसत होते. त्या आक्राळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षात होता. वारा मंद वाहत होता.त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली तीस-पन्नास झोपडी भेदरलेली होती. जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला नि त्या घरात मानसं राहात होती. बेकार वस्तूंनी तिथं बेकारांव छाया धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली मानसं आता तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता पोर खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचार मग्न बसला होता.त्याच्या हृदयात भयंकर हुरहूर उठली होती.त्याला त्या मेलेल्या ...