Posts

Showing posts from December, 2021

देता, देता इतुके द्यावे ...देणाºयाने ‘रामशेठ’ व्हावे...

Image
मधुकर भावे आज एका वेगळ्या विषयावर लिहीत आहे. २७ डिसेंबरला सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज संकुलात एका भव्य इमारतीचे लोकार्पण होत आहे.  ५0 वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेमध्ये  ‘कमवा आणि शिका’ या योजनेत पदवीधर झालेले, नंतर शिक्षक झालेले, नंतर व्यावसायिक झालेले, नंतर राजकारणात आलेले पण राजकारण अंगाला चिकटवून न घेतलेले, व्यवसायात सचोेटीने आर्थिक यश मिळवलेले पण पाय जमिनीवर असलेले... रामशेठ ठाकूर यांनी ही इमारत ‘रयत’ला बांधून दिली आहे. त्यासाठी ७ कोटी ४0 लाख रुपये त्यांनी खर्च केले आहेत. आनंदाने केलेले आहेत. जे केले त्याचे त्यांना फार समाधान आहे. अशी थोडी माणसं असतात, जी समाजाकरिता जगतात.  समाजाकरीता केलेल्या कामात आनंद मानतात. रामशेठ त्यामधले आहेत. त्यांना घरातील सर्व कुटुंबियांचीही तेवढीच साथ आहे.  महाराष्ट्राचं मोठेपण नेमकं कशात आहे?  असा प्रश्न माझ्या मनात हे लिहीताना आला आणि त्याच उत्तरही लगेच समोर आलं. महाराष्ट्राच मोठेपण ‘महाराष्ट्र’ या नावातच आहे.  हे राज्य खरच महान आहे. हे एकमेव राज्य असं आहे, ज्याच्या शब्दात ‘राष...

नवी मुंबई येथे घणसोली याठिकाणी कै वसंत चव्हाण स्मृती चषक दि २५ डिसेंबर व २६ डिसेंबर रोजी एक देखनी भव्य क्रिकेट स्पर्धा पार पडली.*

Image
*नवी मुंबई येथे घणसोली याठिकाणी कै वसंत चव्हाण स्मृती चषक दि २५ डिसेंबर व २६ डिसेंबर रोजी एक देखनी भव्य क्रिकेट स्पर्धा पार पडली.*  ...............................  ✍️ *पै अशोक सावंत पाटील*             सोंडोली .......................   शाहुवाडी क्रिकेट असोसिएशन च्या अंतर्गत कै  *कै वसंत स्मृती चषक* ही भव्य दिव्य अशा प्रकारची क्रिकेट स्पर्धा पार पडली आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक *मा मनोज चव्हाण व मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते*.  गोंडोली हे शाहुवाडी तालुक्यातील एक गाव आहे. आणि याच गावातील *मा मनोज चव्हाण हे सर्व सामान्य कुटुंबातील आणि शेतकरी कुटुंबातील एक आहेत*,गोंडोली सारख्या एका खेड्यातून नवी मुंबईत येऊन आपल्या दिवंगत वडिलांच्या नावाने कै वसंत स्मृती चषक दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा नवी मुंबई येथे घणसोली विभागात आयोजित करुन *कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्याचे नाव मोठे केले आहे.*   खरंच सांगतो या स्पर्धेच्या निमित्ताने गोंडोली गावचे सरपंच *मा काशीनाथ माने* सह गोंडोली गावचे मान्यवर  मा.श्री.अशोक ...

*मा. सम्राट महाडिक (बाबा )* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Image
*मा. सम्राट महाडिक  (बाबा )* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाा          मा. सम्राट महाडीक आणी राहुल महाडीक ही एका रथाची दोन चाके आहेत.  दोन्ही ही तितक्याच वेगाने धावतात जीतक्या वेगाने आगीनगाडी रुळावरून धावते. स्वर्गिय वनश्री नानासाहेब  महाडीक (नाना ) यांचे हे पुत्र म्हणजे रामलक्ष्मणाची जोडी आहे.        महाडीक घराने नेहमीच पैलवानांना एक वरदान होते. त्याच बरोबर कुस्तीची परंपरा सुद्धा या कुटुंबाने अखंड जपली असुन वडीलांच्या पायावर पाय ठेऊन लाल मातीची सेवा बजावत असणारे राम- लक्ष्मणा प्रमाणे ही जोडी मा. राहुल महाडीक, मा. सम्राट महाडिक यांच्या रूपाने शिराळा व वाळवा तालुक्याला लाभली आहे.     सध्या तालुक्यातील युवकांचे आयडॉल ठरलेले व प्रत्येकाला आपले जवळचे वाटणारे सम्राट महाडिक खऱ्या अर्थाने युवकांचे नेते ठरले आहेत. शिराळा, वाळवा तालुक्यात हक्कानी हाक मारल्या नंतर हाकेला ओ देणारे व सर्वसामान्यांच्या मुलांच्या पाठीवर थाप मारणारा हा एकमेव लावलीया असेल ज्याचं नाव सम्राट महाडिक. आज त्यांचा वाढदिवस या वाढदिवसानि...

*शिराळा तालुक्यातील मांगरूळ गावचे सुपुत्र पुढारी *मा आकाराम मस्के (बापू) यांचा आज वाढदिवस*..

Image
मांगरूळ गावचे चाणाक्ष राजनैतिक, स्वाभिमानी नेतृत्व, व शिराळा तालुक्याचे माजी उपसभापती, सहकार शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व, प्रशासकीय पातळीवर ज्यांच्या रुबाबदारीची छाप असणारे, भरदार मिशा, अंगात नेहरू शर्ट, त्यावर धोतर पायात कोल्हापुरी पायतान, तलवारी सारख्या लांबलचक मिशा असा हा राजबिंडा दिसणारा पुढारी आकाराम मस्के  (बापू) आज त्यांचा वाढदिवस. खऱ्या अर्थाने राजकीय पुढाऱ्यांनी कसं दिसावं हे बापूंच्या कडून शिकावे. शिवाय राजकारणातील  डावपेच त्यातील अभ्यास कुठल्या वेळेत काय केलं पाहिजे याचा परफेक्ट अंदाज असणारा हा मंगरूळ गावचा पुढारी. अनेक वर्ष बापूंनी राजकारणात काढली शिवाजीराव देशमुख यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी. मंगरूळ मध्ये आकाराम बापू यांच्याशिवाय देशमुख पार्टी चे पान सुद्धा हलत नव्हते. आज बापू जवळ जवळ ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आज सुद्धा तोच रुबाब आणि तीच स्टाईल पाहायला मिळते. राजकारण करत करत शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर बापूंनी आपल्या चारही मुलांचे शिक्षण पूर्ण केले. किंबहुना त्यांची लग्नही केली. कुठेही नोकरीला नसणारा हा माणूस शेतीच्या जीवावर आपलं कुट...

जनांचा प्रवाह चालला...’

Image
मधुकर भावे पवारसाहेब येत्या रविवारी ८२ वर्षांत पाउल ठेवतील. ८ डिसेंबरला, बुधवारी दिल्लीत ६,जनपथला त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. निवांत वेळ होता. १२ डिसेंबरला शुभेच्छा देणाºयांची गर्दीच गर्दी असेल, त्यांना सहज म्हणालो... आजच, चार दिवस आधी  वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. माझ्यासोबत दिल्ली लोकमतचे संपादक विकास झाडे होते, त्यांनीही शुभेच्छा दिल्या. दिल्लीमध्ये दोन वर्षांनंतर गेलो.  पहिल्यांदा ९0/९१/९२ दोन वर्ष दिल्लीमध्ये लोकमतचा दिल्ली प्रतिनिधी म्हणून काम करतानाची दिल्ली आता राहीली नाही. राजपथ उद्ध्वस्त झालेलं आहे. शास्त्रीभवन, उद्योग भवन यावर बुलडोझर फिरला आहे. रेल भवनसुध्दा आता पाडलं जाणार. संसदभवनसुध्दा. होत्याच नव्हत झाल्यासारखी दिल्ली दिसत आहे. ब्रिटीशांनी जगावर राज्य केलं पण राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट असा भव्य रस्ता आणि परिसर जगात कुठेही नाही. आता ते सगळ उद्ध्वस्त झालेलं आहे. ३000 कोटींचा प्रकल्प मोदी सरकारने हाती घेतलाय म्हणे. उद्या शास्त्रीभवन आणि उद्योग भवन उखडलं जाणार आहे. काय, काय होईल ते बघत रहायचं.  नवीन वास्तू कशी उभी राहील आणि कधी उभी राहीलं. ही ...

राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेसला अपमानित करुन महाराष्ट्रापुरते गोंजारणे सत्तेसाठी सहन करु नका..!

Image
मधुकर भावे मोदी सध्या खुशीत आहेत. शेतकरी विरोधी तीन कायदे मागे घ्याव्या लागलेल्या नाच्चकीतून मोदी देशभर बदनाम झाले असताना ममता बॅनर्जी यांनी नवीन वाद सुरु केला. तो वाद मोदी आणि भाजपाच्या फायद्यातला आहे. २0१४ चे मोदी आता राहीलेले नाहीत. २0१९ चेही मोदी आता नाहीत. त्यांनी भाजपचा कब्जा केल्यापासून वाजपेयीचा भाजपा कधीच संपला होता. पण मोदी-शाह दुकलीने देशभर सोशलमिडीयाला हाताशी धरुन हवा बनवली आणि भारतीय मतदारांनी मोठ्या अपेक्षेने त्यांना सत्तेवर बसवलं. २0१४ ते २0२१ पर्यंत सर्व आघाड्यांवर- महागाई असो, रोजगार जाणं असो, खोट्या घोषणा असो, सर्व विषयात मोदींनी शंभर वर्षे मागे नेलं. धार्मिक उन्माद वाढवून ठेवला. घटना, लोकशाही, लोकसभेतली प्रश्नोत्तरे, हिंमतीनं पत्रकारांना सामोरे जाण, हे सर्व टाळून, ‘मन की बात’, ‘दिल की बात’ असले मार्ग निवडले. एवढा भित्रा नेता आजपर्यंत कुणीच नव्हता, जो पत्रकारांना सामोरा गेला नाही. इंदिराजींचा, कॉंग्रेसचा मोदींनी सतत व्देष केला. पण इंदिराजींची आणि त्यांची तुलनाच होउच शकत नाही. किंबहुना सोनिया गांधीसुध्दा भारतीय संस्कृतीच्या स्त्रिचा सगळ्यात मोठा आदर्श त्याच...

*मराठीयन टीव्ही चॅनेल चे कार्यकारी संपादक, मा विठ्ठल पाटील साहेब वाढदिवस अभिष्टचिंतन*.....

Image
*मराठीयन टीव्ही चॅनेल चे कार्यकारी संपादक, मा विठ्ठल पाटील साहेब वाढदिवस अभिष्टचिंतन*......  -------------------------------      शाहुवाडी तालुक्यातील सरुड जवळच्या शिंपे  गावचे सुपुत्र *मा विठ्ठल पाटील यांचा आज वाढदिवस*..  .............................  *लेखन-पै अशोक सावंत /पाटील* सोंडोली ..........................   पाटील साहेब यांच्या बाबतीत बोलायचं झाले तर *मी ईतकच म्हणेन की एक अभ्यासु व्यक्ती मत्व*....    पाटील साहेबांचे वडील ग्रामसेवक होते,त्यामुळे पाटील साहेबांना शिक्षण, आणि सामाजिक बांधिलकीची जाण होती. कोणत्याही सामाजिक कामासाठी पाटील साहेब कटीबद्ध होते. पुणे याठिकाणी त्यांचे बंधू सर्व्हिस ला होते त्यांच्या जवळ पाटील साहेब पुण्याला गेले, त्याठिकाणी त्यांनी उच्च शिक्षण घेतले. शिक्षणात पण हुशार असणारे पाटील साहेब यांना नेहमी वाटायचे की आपण आपल्या लेखनीतुन बाहेर काय चालू आहे हे समाजापर्यंत पोहचवायचे, त्यातच सकाळ या वृत्तपत्रात एक जाहिरात आली की सकाळ पेपर साठी अनुभवी लोकं पाहिजेत,आणि त्यासाठी स्पर्धा परीक्षा सुद्धा द्...

हल्ली, बोरं ही नाही, आणि बोरं, खायला पोरं ही नाही.

Image
हल्ली, बोरं ही नाही, आणि बोरं, खायला पोरं ही नाही. चिखली - मनोजकुमार मस्के हिवाळा काळात मिळणारी गावरान बोरं अलीकडे दिसेनाशी झाली. त्याला कारणही तसंच आहे शेतातील बांधावरील बोराची झाड गायब झाली आहेत. परिणामी गावरान बोर खायला मिळतील का नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे. एखाद्या बाजारपेठेत गावरान बोरं असलीच तर त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. अॅप्पल बोर ही बाजारपेठेत महाग झाले आहे. ५-१०रूपये किलो मिळणारी बोरं आता 35 ते 40 रुपये किलो मिळते. पूर्वी शेतातील बांध, नदी, ओडा या जागी गावरान बोराची झाडे दिसून येत होती त्यामुळे दिवाळीनंतर बोरं खाण्याची धमाल असे. परंतु सध्या अशी झाडे अपवादानेच पहावयास मिळतात संकरित व मोठ्या आकाराची बोरांनी  बाजारपेठ व्यापली असली तरी गावरान बोरं खाण्याची मजा यात नाही. मागील वर्षी बाजारपेठेत एप्पल बोर मोठ्या प्रमाणात दाखल झाली होती परंतु यंदा या बोरांची आवक नसल्यात जमा आहे. त्यामुळे ग्राहकांना नाविलाजाने अन्य संकरित बोराची खरेदी करावी लागत आहे. अशा बोरांचे दरही अधिक आहेत आणि दुसरीकडे गावरान बोर ही मिळत नाही. शेतकरी म्हणतात आमच्या शेतातील बांधावर ...