मा मंत्री मा. शिवाजीराव नाईक (साहेब) वाढदिवस विशेष*....
*मा मंत्री मा. शिवाजीराव नाईक (साहेब) वाढदिवस विशेष*....
--------------------
✍️ *पै मनोज मस्के* पत्रकार 9890291065
........................
शिराळा तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात *'नाईक साहेब'* म्हणुन ओळखले जाणारे *माजी मंत्री. शिवाजीराव नाईक साहेबांचा यांचा आज वाढदिवस*......
1995 ह्या साली तालुक्यात एक इतिहास घडला. एकाच राशीची दोन माणसं एकमेकांपासून दूर झाली. एक नेता आणि एक कार्यकर्ता. त्यावेळी जवळ धरून दुर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणी एका प्रामाणिक कार्यकर्त्याला सहज बाजुला करण्याचा प्रयत्न झाला. तोच जिवाभावाचा कार्यकरता मोठ्या जिद्दीने स्वतःला सिद्ध करायला निघाला. एका वेगळ्या राजनितीमुळे तालुक्याचा इतिहासच बदलला. मग *एकमेकाच्या विचाराचे एकमेकाला शत्रु समजू लागले. ईथं खरा संघर्ष सुरू झाला*.
आपमानाची ताकद एवढी असू शकते हे तालुका प्रथमच अनुभवत होता. चिमटीत धरून बाहेर करावं असा एक कार्यकर्ता बाजूला करण्यात आला. ती आग एवढी भिषन होती की, पेटलेली आग सर्व गीळत गेली ती थांबता थांबेना. *आणी जे व्हायचं तेच झालं कार्यकर्त्याचा आमदार झाला, आमदाराचा मंत्री झाला*. आणी तालुक्याचा इतिहास बदलला. *नाव तेच पण आडणाव मात्र बदलले, निवडणूक तीच पण पक्ष मात्र वेगवेगळे होते*.
कार्यकर्त्याचे आमदार झाले आणि *आमदाराचे मंत्री झाले त्यांचे नाव शिवाजीराव नाईक साहेब*..... या कार्यकर्त्याने करून दाखवले. अनेक कामं स्वतःच्या ताकदीवर तालुक्यात करून दाखवली. आपलं अस्तित्व उभा केलं. वाकुर्डे बुद्रुक योजना काम सुरू करून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, *शिवाजी केन, यशवंत ग्लुकोज कारखाना, सुनंदा दुध* यासारखे अनेक उद्योगधंदे उभा करण्यात आले. बघताबघता तालुक्यातून आडणावच बाजुला होत गेलं. *पण नाव मात्र तेच राहीलं. आणी पदवी सुद्धा तीच 'साहेब'*..... !.
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम अनेक संकटांना सामोरे जावे लागते. स्वतः उभा केलेलं साम्राज्य अडचणीत आलं असलं तरी ते परत कसं उभा करायचं *याचा गाढा अभ्यास शिवाजीराव नाईक साहेबांना आहे*. अनेक टीका सहन कराव्या लागतात. हे सर्व करत असताना अनेक वादळं आली ती पेलण्याची ताकद मनगटात नव्हे तर बुद्धीत होती. आजपर्यंत त्याच बुद्धीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचं एक वलय *माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी तयार केले आहे*. आज तालुक्यात एवढा हुशार बुद्धीवान नेता दुसरा कोणीच नाही. कोणाच्या आशीर्वादाने नव्हे तर मेहनतीने, संघर्षाने ऊभा केलेला हा जनतेचा प्रपंच आहे. आज अनेक अडचणींना तोंड देत असताना अनेकांना वाटत असेल की, आता सारं संपलं . पण एक गोष्ट मात्र नक्की असते. वाघ दोनपावलं माग सरकतो म्हणजे डरपोक आहे म्हणून नाही. तर पुढे चांगली शिकार आहे या उद्देशाने. संघर्षातून घडलेल्या नेत्याला शिकार कशी करायची माहीत असते. पुर्वी जनता आडाणी होती. आता जनता सर्व जानुन आहे.
संपूर्ण तालुक्याला माहित आहे नाईक साहेब नेता नंबर ऐक आहे. राजू शेट्टी खासदार झाले तेव्हा याच सार्थ्याने रथ हाकला होता. 2019 ला धैर्यशील माने खासदार झाले तेव्हाही रथ हाकण्याचे काम शिवाजीराव नाईक साहेब यांनी केले. राजकारणातला तगडा अनुभव म्हटलं तर वावग ठरणार नाही. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले हे नेतृत्व असल्याचे मानले जात आहे. कार्यकर्त्याचे एखादं काम नाही झालं तरी चालते परंतु कार्यकर्त्याला वेळ देणारा नेता म्हणून शिवाजीराव नाईक यांचं आदराने नाव घेतलं जातं. छोट्या छोट्या कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून त्यावरती काय करता येईल.. याचा सविस्तर अगदी शांतपणे त्याला त्याच्याच भाषेत समजेल असं उत्तर देऊन त्याचं सांत्वन करणारा नेता शिवाजीराव नाईक कार्यकर्त्याला आपलेसे वाटतात. आणि म्हणूनच आपल्या गोड वाणीने आणि सामान्यतल्या सामान्य व्यक्तीच्या खांद्यावर हात टाकून, त्याच्या शेजारी बसून चटणी भाकरी खाणारा हा नेता प्रत्येक गावात पाच-पन्नास कार्यकर्त्यांना नावानिशी हाक मारतो. म्हणूनच तर शिवाजीराव नाईक हे आपल्यातलेच आणि घरातले वाटतात .
1 मार्चला माझा वाढदिवस साजरा झाला. साहेबांनी मला आवर्जून फोन करून शुभेच्छा दिल्या. अजुन काय लागतं सामान्य मानसाला फक्त चार शब्द आपुलकीचे बस्स . आज 2 मार्च साहेबांचा वाढदिवस आयुष्यातील सर्व सुख या व्यकतीला मिळावे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.
*अश्या या सामान्यातल्या सामान्य नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*!-------------------
धन्यवाद
- पै मनोजकुमार मस्के*- पत्रकार
Comments
Post a Comment