Posts

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*

Image
*रात्री माझं गाव विकताना पाहिलं* निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं* कुठे हजारात, कुठे पाचशेत बरबाद होताना पाहीलं गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन गावं *मटन आणि दारुत* बुडवताना पाहीलं  निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी *माझं गाव विकताना पाहील* इतक्या दिवस साड्या ओढणारं अचानक साड्या वाटताना दिसलं  मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी  गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,  रात्री मी *माझं गाव विकताना पाहिलं*  पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला... त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ  मी माझ्या डोळ्यांनी पाहीला निवडणुकीच्या पहिल्या रात्री  *मी माझं गाव विकताना पाहिलं* गरिबांना पायदळी तुडवणारा आता त्यांच्या पाया पडताना दिसला गरिबांच्या झोपडीकडे जाताना  त्याचे जोडे केवढे घासले पण वरवरच्या प्रेमाचा डाव  मी त्याच्या तोंडावर पाहीला, निवडणुकीच्या पहिल्या रात्री  *मी माझं गाव विकताना पाहिलं* लोकशाही ढाब्यावरच बसवून  त्याने तोडलेत गरीबांचे लचके आज दडपशाही मतदानाला आणली  गाव...

‘राडा’ हवा की ‘गाव-गाडा’ चालायला हवा?

Image
‘राडा’ हवा की ‘गाव-गाडा’ चालायला हवा? - मधुकर भावे २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होईल. प्रचाराकरिता ३ दिवस आहेत. एका बाजूला ‘आघाडी’ आहे...  दुसऱ्या बाजूला ‘युती’ आहे.  युती का झाली? त्याचे कारण महाराष्ट्र जाणतो. भुजबळांनी त्याचा तपशीलवार खुलासा करून टाकला. त्यामुळे युतीचे स्वरूप, फाटाफूट, पक्षफोडेपणा या सगळ्या गोष्टींची खूप चर्चा झाली. महाराष्ट्रातील मतदार शहाणा आहे. लोसकभा नवडणुकीत याच मतदाराने भाजपा आणि त्यावेळच्या युतीला दाखवून दिले होते... युतीचे नेते हेच सांगत होते की, ‘महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा आमच्या’ बावनकुळे म्हणाले होते, ‘४८ पैकी ४८...’ आताही िशंदे आणि त्यांच्या सर्व जाहिरातींमध्ये ‘आमचेच सरकार येणार’ अशा करोडो रुपयांच्या जाहिराती झळकत आहेत. निवडून कोण येणार हे मतदार ठरवतील. महाराष्ट्रात राजकीय ‘राडा’ हवा असेल तर मतदार युतीला विजयी करतील. महाराष्ट्राचा ‘गाव-गाडा’ गोडी-गुलाबीने चालायला हवा असेल तर, सर्व जाती-धर्मांनी एकत्रित राहूनच महाराष्ट्राचा विकास होईल. हे समजून घेतले तर प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. त्यामुळे निवडणुकीत अव्वाच्या सव्वा बोलून काही उ...