Posts

Showing posts from January, 2025

आईच्या किडनीमुळे जीवदान.. मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा विक्रम... डॉ. तात्याराव लहाने

Image
आईच्या किडनीमुळे जीवदान.. मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा विक्रम...  डॉ. तात्याराव लहाने      वयाच्या ३९ व्या वर्षी दोन्ही किडन्या नीकामी झाल्या, अन् डॉक्टरांनी तुमच्याकडे काहीच दिवस शिल्लक असल्याचे सांगितले, तुम्ही मरणार असे भाकीत केले. पण आईचा आशीर्वाद व आईने दिलेल्या किडनी मुळे मला पुनर्जन्म मिळाला. माझ्यासाठी आईने १६६ टाक्यांच्या वेदना सहन केल्या. अशा आयुष्यातील आलेल्या अडचणींवर मात करत  "मी कसा घडलो" या विषयावर स्वर्गीय शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना नेत्रतज्ञ  पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आपला जीवनप्रवास उलघडला.      शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड निनाई साखरचे माजी  चेअरमन फत्तेसिंगराव देशमुख माजी सभापती बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.      माकेगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील एका गरीब घरात झालेला जन्म, आई-वडील, पाच बहिणी आणि दोन भाऊ असे तब्बल दहा माणसांचे कुटुंब, शेतमजूर वडील अशा प्रतिकूलतेवर मात करीत घरातील एकमेव शिक्षित मुलगा ते दोन लाख पाच हजार नेत्रशस्त्रक्रिया करणारा डॉक्ट...

स्वर्गीय शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

Image
     कोकरुड ता. शिराळा येथे स्वर्गीय शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेचे पहिले पुष्प  "मोगरा फुलला" एकभक्तीमय  संध्याकाळ या प्रबोधनकार गणेश शिंदे व गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांच्या  बहारदार सांसंस्कृतीक कार्यक्रमाने पार पडले. शिंदे यांनी अभंगवाणीतून ज्ञानेश्वर माऊलीचे जीवन चरित्र रेखाटले. यावेळी आमदार सत्यजित देशमुख, निनाई साखरचे माझी चेअरमन फत्तेसिंगराव,देशमुख माजी सभापती बाळासाहेब पाटील, संपतराव देशमुख, प्रमुख उपस्थित होते.       शिंदे यांनी ज्ञानेश्वरांच्या जीवनावर सकोल प्रवचन करत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ते आपल्या प्रबोधनात म्हणाले, आपल्या जीवनात सर्वात जास्त प्रेम आपल्यावर आई-वडील करतात. तेव्हा आई-वडील मुलगा मुलगी ही नाती जपा, आई-वडिलांची मान शर्मिने खाली जाईल असे कोणते कृत्य करू नका. जीवनात डोकावून पहा की कधी आपण कोणाची वाईट तरी केले नाही ना, कारण केलेले कर्म हे तितक्याच वेगाने परत येत असते.     आमदार सत्यजित देशमुख म्हणाले गेली सात वर्षे या व्याख्यानमालातून तरुण पिढीमध्ये सशक्त सांस्कृतिक मूल्ये रुजविण्...

मांगरूळ मध्ये क्रिकेटचे सरावासाठी आणली सराव जाळी

Image
मांगरूळ मध्ये क्रिकेटचे सरावासाठी आणली सराव जाळी मांगरूळ येथे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी एकत्र येऊन क्रिकेट सराव नेट आणले. हे नेट हुतात्मा स्मारक परिसरात क्रिकेट ग्राउंड करून त्यामध्ये बांधण्यात आलेले आहे. सोमवार दि. 13 रोजी या सराव जाळीचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य भगवान मस्के, पैलवान विकास पाटील, महादेव खांडेकर, गोपाळ लोहार, पोपट मस्के, सुनील खांडेकर, राजाराम जोशी, अभिजीत मस्के यांच्या उपस्थितीत केले.  मांगरुळ येथील क्रिकेट वेड्या मुलांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील मुलांना नेटमध्ये क्रिकेट खेळण्यास व सराव करण्यास मदत होईल या उद्देशाने हे नेट बांधण्यात आले असल्याचे सांगितले. सध्या क्रिकेटचे वेड अनेक गावात मोठ्या प्रमाणात असल्याने प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा क्रिकेटचे नियम जाणून घेण्यासाठी या नेटचा उपयोग होईल असे मांगरूळ येथील युवकांनी सांगितले. क्रिकेटचे नियम आणि क्रिकेट खेळण्यासंदर्भात ग्रामीण भागातील मुलांना कुठे सुविधा नाहीत याचा विचार करून या मुलांनी हे पाऊल उचललेले दिसते. दररोज प्रॅक्टिस करत असताना अनेक वेळा वेगवेगळे ठिकाणी चेंडू जाऊन इतरत्र लोकांना त्य...

*दै. सकाळचे शिराळा तालुका प्रतिनिधी शिवाजीराव चौगुले यांना स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन*....

Image
*दै. सकाळचे शिराळा तालुका प्रतिनिधी शिवाजीराव चौगुले यांना स्वर्गीय बाळाजी बाजीराव पाटील आदर्श पत्रकारिता पुरस्कार  मिळाला त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन*.... मनोज मस्के - 9890291065 ज्यांच्या लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला अनेकांचे प्रश्न मार्गी लावले व अनेकांना चुकाही दाखवून दिल्या किंबहुना प्रशासनामध्ये आपल्या लेखणीचा एक धबधबा निर्माण करणारे मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारे आमचे मित्र दै. सकाळचे प्रतिनिधी , डॉ. शिवाजीराव चौगुले यांना स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील  आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे.  शिराळा तालुक्यातील आराळा हे शिवाजीराव चौगुले यांचे मूळ गाव. घरची परिस्थिती अतिशय गरीबीचे त्यातूनच त्यांनी डॉक्टर पर्यंत शिक्षण पूर्ण केले. पहिल्यापासूनच समाजसेवेची प्रचंड आवड. त्यांनी आपल्याच गावात एक छोटंसं क्लिनिक चालू केले.  अनेक पेशंटला तर ते पैसे न घेताच उपचार करत असत.   वाचनाची प्रचंड आवड असल्याने आपण समाजाचे  प्रश्न लिहावे समाजाची व्यथा मांडाव्या या हेतूने त्यांनी लिहायला सुरुवात केली. खरतर पत्रकारतेचा अनुभव त्यांच्य...

स्पर्धात्मक कुस्ती काळाची गरज... गावोगावी होणारी मैदाने खेळाडुंसाठी घातक...

Image
स्पर्धात्मक कुस्ती काळाची गरज... गावोगावी होणारी मैदाने खेळाडुंसाठी घातक... *मनोजकुमार मस्के, मांगरूळ* 9890291065 कुस्ती ही प्राचीन काळापासून चालत आलेली असल्याने कुस्तीला फार मोठं महत्त्व महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दिले जाते. हा खेळ तसा ताकतीचा आणि डाव प्रतिडाव करण्याचा आहे. तसं पाहिलं तर सर्वच देश हे कुस्तीमध्ये अग्रेसर असल्याचे पाहायला मिळते. परंतु महाराष्ट्राची कुस्ती आणि त्यातल्या त्यात कोल्हापूरची कुस्ती ही जगभर प्रसिद्ध असल्याने महाराष्ट्रातल्या कोल्हापूरला आणि कोल्हापुरातल्या पैलवानाला एक वेगळा दर्जा दिला जातो. एकेकाळी संपूर्ण जगभरातील  पैलवान सुद्धा कोल्हापूरच्या आखाड्यात खेळण्यासाठी अतुरलेले होते. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आज मात्र या कोल्हापूरची कुस्ती पुण्याकडे सरसवली आणि तांबड्या मातीचा रंग हळूहळू फिका पडू लागला.  महाराष्ट्राचा पैलवान हा महाराष्ट्र केसरीतच अडकला. आज ऑलिंपिकचं स्वप्न बघणारा पैलवान सुद्धा कुस्तीचे मैदानी खेळू लागला. देशासाठी मिडल आणणार असं ठामपणे न्यूज चॅनेल च्या समोर सांगणारा महाराष्ट्र केसरी पैलवान आज लाखो रुपयेच्या  कुस्...