Posts

Showing posts from December, 2022

नारायणा..., तुला आणि तुझ्या बोलवत्या धन्यांना १०० पिढ्यांत मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही...

Image
नारायणा..., तुला आणि तुझ्या बोलवत्या धन्यांना १०० पिढ्यांत मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही... ‘अन्यायायाने संतप्त झालेल्या तीन कोटी मराठी जनतेला वाघनखे फुटतील.... आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढला जाईल’ - आचार्य अत्रे, (१९५८ : शिवाजीपार्क भाषण) कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री अश्वस्थ नारायण यांनी ‘मुंबई केंद्रशासित करा’ ही आगलावी भाषा मुद्दाम केलेली आहे. केंद्रात कोणाचेही सरकार आले तरी किंवा आताचे जे सरकार आहे, त्यांच्याजवळ पूर्ण बहुमत असले तरी .... मुंबई केंद्रशासित करणे कोणालाही शक्य होणार नाही. जर तसा प्रयत्न झाला तर त्या सरकाराचे येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता श्राद्ध घालील.  महाराष्ट्रात हा प्रयोग ६५ वर्षांपूर्वी झाला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण होऊ नये म्हणून असे ५६ नारायण कोळून प्यायलेले  फार दिग्गज नेते महाराष्ट्राच्या विरोधात सूड- कारस्थान करून बसलेले होते. त्यांचे अधीपती स. का. पाटील हे  होते. रुतुभाई आडाणी होते... शांतीलाल शहा होते... बाबुभाई चिनॅाय होते... हा एक मोठा कट होता. मुंबई महाराष्ट्रापासून अलग क...

छोडो-भारत’कडून ‘जोडो-भारत’कडे--

Image
‘छोडो-भारत’कडून ‘जोडो-भारत’कडे ---------------------------------------------- - मधुकर भावे ------------------- उद्या २८ डिसेंबर... बरोबर १३७ वर्षांपूर्वी मुंबईत काँग्रेसची स्थापना याच दिवशी झाली. गोवालिया टँक म्हणजे आजच्या  अॉगस्ट क्रांती मैदानातील तेजपाल बिल्डींगमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापन झाला. व्योमेशचंद्र बॅनर्जी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले. तिथपासून आजपर्यंत १३७ वर्षांत ८३ अध्यक्षांनी काँग्रेसची पताका फडकवत ठेवली. आजचे अध्यक्ष खरगे यांच्यापर्यंत... लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू या तीन मुख्य खांबांना काँग्रेसची कमान मानली गेली होती. त्यांच्या तोडीस तोड असे चारित्र्यसंपन्न आणि देशभक्त नेते काँग्रेसचे निर्विवाद नेते होते. काँग्रेस म्हणजे चारित्र्य, काँग्रेस म्हणजे देशभक्ती हे सूत्र काँग्रेस भोवती सतत फिरत होते. ‘सेवा’, ‘त्याग’, ‘समर्पण’ ही काँग्रेसची आयुधे होती. महात्माजींनी गांधी टोपी घातली नाही. पण गांधी टोपीचे महत्त्व वादातीत होते. ही टोपी चरित्र्याचे प्रतिक होती. देशभक्तीची पांढरीशुभ्र धवल कथा होती. खादी हा कपड्याचा प्रकार नव...

ग्रामपंचायत सदस्य झालो, सरपंच झालो, आता पुढे काय?

Image
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील पात्र मतदाराकडून सरपंचपदाची थेट निवडणूक झालेली आहे. त्यामुळे निश्‍चितच स्थिरता येईल, अशी आशा करण्यास हरकत नाही. आता या सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गावाच्या लोकांचे हित ज्यात सामावलेले आहे त्यांना प्राधान्य देणे गरजेचे राहील. घटनेने सर्वांसाठी कायद्याची चौकट दिली आहे. राज्यात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ नुसार ग्रामपंचायतीचा कारभार करावा लागतो. सरपंच आणि सर्व सदस्यांना आधी ग्रामपंचायत समजून घेणे गरजेचे आहे. जे अनुभवी आहेत, त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल. तथापि, नव्याने नियुक्त झालेले तरुण सरपंच, सदस्य मोठ्या प्रमाणावर निवडून आले आहेत. त्यांचा उत्साह आणि ऊर्जा दांडगी आहे. या लोकांनी ग्रामपंचायत आणि त्याचा कारभार समजून घेणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी यशदा आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रशिक्षणाची सोय उपलब्ध केलेली असते.  नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांनी या प्रशिक्षणास जाणे क्रम प्राप्त आहे. महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज प्रणाली आहे. यामध्ये ग्रामपंचायत शीर्षस्थानी आहे, पंचायत समिती आ...

*बिळाशीच्या सिद्धेश भोसलेची मुंबई शहर कबड्डी संघात निवड*

Image
*बिळाशीच्या सिद्धेश भोसलेची मुंबई शहर कबड्डी संघात निवड* बिळाशी गावचा सुपुत्र सिद्धेश भोसलेची  महाराष्ट्र राज्य कबड्डी स्पर्धेसाठी जूनियर मुंबई शहर कबड्डी संघात निवड. परीसरातुन कौतुकाचा वर्षाव.   महाराष्ट्राचा सांगली जिल्ह्यातील बिळाशी गावच्या सुपुत्र सिद्धेश भोसले हा सध्या आय टी डिप्लोमा विद्या अलंकार पॉलिटेक्निकल कॉलेज  मुंबई येथे शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर तो सिद्धी प्रभा फाउंडेशन कडून खेळणारा खेळाडू आहे.       आतापर्यंत सिद्धेशने आपल्या संघाला 15 ते 20 बक्षीस मिळवून दिलेली आहेत. यासाठी  त्याचे शिक्षक अमोल पवार यांनी मार्गदर्शन केले. आई वडिलांचेही तितकेच परिश्रम असलेचे सिद्धेशने सांगितले.         मागील  महिन्यामध्ये झालेल्या आय टी कॉलेज  कोकण विभाग व मुंबई विभाग स्पर्धेमध्ये आपल्या कॉलेजच्या संघाला त्याने व त्याच्या टीमने  सुवर्णपदक मिळवून दिले. यामध्ये टोटल 80 टीम होत्या त्यामधून सिद्धेश च्या टीमने आपल्या संघासाठी सुवर्णपदक खेचून आणले असे शिक्षक अमोल पवार यांनी सांगीतले. सिद्धेशला मिळालेले यश व त्...

शरद पवारसाहेब, ‘महाराष्ट्राच्या आत्मसन्मानासाठी आवाज द्या....’

Image
शरद पवारसाहेब, ‘महाराष्ट्राच्या आत्मसन्मानासाठी आवाज द्या....’  १२ डिसेंबर. हा दिवस एका व्यक्तीच्या वाढदिवसाचा दिवस राहिलेला नाही. तो महाराष्ट्राच्या सामुदायिक आनंदाचा दिवस झालेला आहे. श्री. शरद पवार या दिवशी ८२ वर्षे पूर्ण करून ८३ व्या वर्षांत पाऊल ठेवत आहेत. ८ मजले चढून झाले आहेत. नवव्या मजल्याच्या दोन पायंड्या चढून अाता तिसऱ्या पायंडीवरती ते उभे आहेत. त्यांनी आणखी १७ पायंड्या चढावे... शतक पूर्ण करावे... बिनबाद रहावे... ही आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राची प्रार्थना आहे. पुढच्या काही वर्षांत तर शरद पवारसाहेबांची सगळ्यात मोठी गरज महाराष्ट्रासाठी आहे. त्यांच्या नेतृत्त्वाची गरज आहे.  पुरोगामी महाराष्ट्राची उस्कटलेली सगळी शिवण पुन्हा पूर्ववत करणारा एकमेव नेता म्हणून आज पवारसाहेबांकडे महाराष्ट्र पाहतो आहे... राजकारणाचा चिखल, राजकारणातील धटिंगणपणा हे सगळे महाराष्ट्राला असह्य होणारे घाणेरडे वातावरण दुरूस्त करायचे असेल तर, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचे राजकारणी म्हणून श्री. शरद पवार यांच्याखेरिज दुसरे नाव महाराष्ट्राजवळ आज नाही.  या बिघडलेल्या महाराष्ट्राला पुन्हा...

मांगरूळ येथे ग्रामपंचायत निवडणुकिची मोर्चेबांधणी.,.9 सदस्य जाणार निवडुन...सरपंच पद अनुसुचित जाती गटाकडे

Image
मांगरूळ येथे ग्रामपंचायत निवडणुकिची मोर्चेबांधणी.,. 9 सदस्य जाणार निवडुन...सरपंच पद अनुसुचित जाती गटाकडे मांगरूळ - मनोजकुमार मस्के  ऐन थंडीच्या महिन्यात शिराळा तालुक्यातील गावोगावी शेकोटी बरोबरच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. जिरवा - जिरवीच्या राजकारणाला उधान आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिराळा तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या मांगरूळ येथे गाव पुढाऱ्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून गावात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सरपंच पद अनुसुचित जाती गटातील पुरूष अथवा महिला राखीव असून नव सदस्यांना तीन वार्डातून निवडून द्यायचे आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापत आहे दिवसाला शेतकरी व मजूर शेतात राबत असल्याने रात्रीच्या बैठकीला महत्त्व आले आहे. जातीय समीकरणातून कोणत्या वर्गात कोणता उमेदवार दमदार असेल याची चर्चा जोर धरत आहे . सर्वसामान्य नागरिकांना मात्र यात उत्साह दिसत नाही. दोन गटा व्यतिरिक्त तिसऱ्या गटाची चर्चा अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे. संपूर्ण तालुक्यातील राजकारणात मांगरूळचे वर्चस्व आजही कायम आहे. येथील कोणतीही निवडणूक चुरशीचीच होते मांगरूळ...

उसापेक्षा वाडे महाग, उसाचे वाडे ३०० रुपये शेकडा....

Image
उसापेक्षा वाडे महाग, उसाचे वाडे ३०० रुपये शेकडा.... मनोजकुमार मस्के-मांगरूळ  शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात चारा टंचाईमुळे उसाच्या वाड्याला मोठी मागणी वाढली आहे. आता उसाच्या वाड्याला शेकडा ३०० रुपये मोजावे लागत आहे. ऊस तोडीचे हंगामाच्या सुरुवातीलाच हा दर अधिक आहे. परंतु चारा टंचाईमुळे शेतकरी जादा दर असताना देखील उसाचे वाडे मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहे.      तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या ऊस तोडी जोरात चालू आहे. उसतोडी चालू झाल्यामुळे उसाचे हिरवेगार वाडे शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या जनावरांना घालतात. फेब्रुवारी महिन्यानंतर उन्हाळ्याच्या चाराटंचाई दिवसांमध्ये उसाच्या वाड्याला मागणी वाढते. परंतु यंदा अति पावसामुळे चारा खराब झाला असल्याने आतापासूनच चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या जनावरांना ओला चारा खायला नाही. या परिसरात ऊसतोड चालू झाल्याने हिरवेगार वाडे मिळत आहे. परंतु मागणी अधिक होत असल्याने उसाच्या वाड्याने देखील भाव खाल्ला आहे. उसाच्या वाड्याला आत्तापासूनच शेकडा ३०० रुपये मोजले जात आहेत. यापुढे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये य...

मांगरूळचा पै. आदित्य मस्के हा शिराळा तालुका शालेय

Image
*मांगरूळचा पै. आदित्य मस्के हा शिराळा तालुका शालेय कुस्ती स्पर्धेत ५५ किलो वजन गटात अव्वल ठरला*....  जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आदित्यची निवड........  -----------------    शिराळा तालुक्यातील मांगरुळ गावचे 'कुस्ती हेच जीवन' शिराळा तालुका अध्यक्ष *पै मनोज मस्के (पत्रकार) यांचे चिरंजीव पै आदित्य मस्के* याने चिंचोली येथे संपन्न झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात मॅट विभागातुन त्याच्या गटातील अनेक  चांगल्या पैलवानांवर विजय मिळवत शालेय कुस्ती स्पर्धेतुन ५५ किलो वजन गटात आपल्या भात्यातील डावाच्या अस्त्राचा वापर करून अव्वल ठरला.  काही दिवसात सांगली मिरज येथे होणार्या जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.  आदित्य सध्या पुणे येथे मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात *वस्ताद ज्ञानेश्वर मांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कष्ट करतो आहे*. शिवाय  कुस्ती कोच पै वरुन त्यागी सर, पै चंद्रशेखर धुमाळ सर, संजय खांडेकर सर, पै कृष्णा फिरंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे येथे तो कसून सराव करतो...