1मार्च ला माझा वाढदिवस

1मार्च ला माझा वाढदिवस साजरा करण्यात आला. माझ्या 44 वर्षांत मी स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही. आयुष्याच्या धावपळीत जगणं विसरल्याने आपला स्वतःचा वाढदिवस कधी येतो आणि कधी जातो ते माहीतच नव्हते.   
   1 मार्च रोजी नेहमीप्रमाणेच मी सकाळी लवकर उठून आवरा आवर करत असताना माझ्या पत्नीने  मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बाजुला अभ्यास करत असणारी माझी कन्या श्रावणी व मुलगा अदित्माय झ्याजवळ येऊन म्हणाली ढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पापा...  एवढेच काय तर माझी आईने सुद्धा मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मि म्हणालो आरे आज मझा वाढदिवस कसाकाय... तिने आज १मार्च असल्याचे सांगीतले. गेल्या वर्षीचा माझा वाढदिवस महाशिवरात्रीला आला होता. यावर्षी माझा मलाच वाढदिवस माहीत नव्हता आणि कोणाला त्याची खबर असेल असं वाटत सुद्धा नव्हतं. परंतु शुभेच्छा देण्यासाठी अनेकांचे फोन येऊ लागले.  भावांनी, भावजईनी पण शुभेच्छा दिल्या. आईने अशिर्वाद दिले. माझ्या मित्रांनी, वरिष्ठांनी, पैलवानांनी, पत्रकारांनी, संपादकांनी फोन करून, मॅसेज टाकुन, माझ्यावरती लेख लिहून ज्या शुभेच्छा दिल्या त्या माझ्यासाठी खुप मोलाच्या होत्या. 
माझ्या घरच्यांनी माझ्या भावाने माझ्याबद्दल जे शब्दरूपी मन मोकळे करणारे शब्द लिहिलेले होते ते वाचून तर माझे डोळे पाणावले. खरंच इतकी माणसं आपल्यावर प्रेम करणारी असताना मी एकटा कसा असं मला आज थोडसं जाणवून गेलं. अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या.. खरंतर मी इतका मोठा  नाही. पण माझ्या सारख्या सामान्य पत्रकाराला एवढ्या मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देणे हे माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट व  अविस्मरणीय गोष्ट होती. खरंतर मित्र परिवारांच्या, सग्या- सोयऱ्यांच्या, कुटुंबाच्या आणि नाते-गोतेच्या शुभेच्छांमुळे माझ्या मनातील एक कप्पा रिकामा करून त्या जागी माणुसकीची ही जागा कायम केली. 
 मला जास्त आनंद झाला माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा शुभेच्छा देण्फोयासाठी फोन आला तेंव्हा. खरंच माणूस मोठा कधी होतो जेव्हा मागे वळून छोट्या-छोट्या माणसाला सुद्धा तो न विसरत त्याची विचारपूस करतो. याच प्रत्युत्तर आज मला माजी मंत्री नाईक साहेब यांनी फोन करून दिलेल्या शुभेच्छातुन  मिळाले .  मला खूप मोठा अनुभव होता तो कारण एका सामान्य पत्रकाराला माजी मंत्री आवर्जून फोन करतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात तेव्हा तो आनंद गगनात मावत नसतो .  सध्याचे आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांनी पत्राद्वारे  शुभेच्छा पाठवल्या. 
माझ्या आयुष्यात मी पैसा कमविला नाही पण आपल्यासारखी पैशाच्या किंमतीची माणसं कमवता आली आणि ती टीकविण्याची शक्ती स्वामी समर्थांनी दिली त्यांचा मी आभारी आहे. खरंच वाढदिवस अनेक मनं, नाती जवळ आणतो हे मात्र खरे आहे.  माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या असंख्य मित्रांनी काॅलमच्या- काॅलम लीहुन  माझ्या प्रतिमेचे बॅनर टाकुन जे प्रेम दिलं ते मी कधीही विसरू शकणार नाही. माझ्या वाढदिवसाला माझे मित्र  सुरेश जाधव, विजय मस्के, आनंदराव पाटील, निलेश मस्के, विशाल खांडेकर, आकाश आढाव तसेच माझे मेहुणे अर्जुन आणि अरूण व त्यांच्या मित्रपरिवाराने केक आणून माझ्याप्रति जिव्हाळा निर्माण केला. त्याच बरोबर हॉटेच्या सर्व स्टाफने मिळून माझ्यासाठी आणलेला केक माझ्यासाठी अविस्मरणीय होता. 
    खरं पाहता आनेक मित्रांनी माझ्यावर विश्वास व प्रेम दाखवला. माझे गुरू शिवाजी रसाळ सरांनी तसेच माझ्या भावांनी जे शब्दरूपी दिलेलं दान आणि हॉटेल मधल्या सुवर्णा मावशीने व ईतर स्टफने आणलेला माझ्यासाठी केक हे मात्र मला भाराऊन टाकणारं दान होतं. मनातील अक्षरं पानावर येणं इतकं सोप्पी गोष्ट नाही. त्याला तीतकं जिव्हाळ्याचे नाते असावे लागते. काल माझ्या दोन्ही भावांनी माझ्यावर भरभरून लीहले आणी वडीलांचा मान दिला इथंच मी आयुष्यातील सर्व सुखं भोगल्या समान आहे.  त्याच बरोबर आपण दिलेल्या लाख मोलाच्या शुभेच्छा व आपल्या सर्वांच्या प्रेमाने मी भारावून गेलो होतो. असंच प्रेम अखंड रहावो हीच प्रार्थना.  पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद! आणि सर्वांचे आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏

मनोज मस्के - मांगरूळ

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....