Posts

Showing posts from August, 2024

*भावपूर्ण श्रद्धांजली – संजय गणपती पाटील (संजू दादा)*

Image
*भावपूर्ण श्रद्धांजली – संजय गणपती पाटील (संजू दादा)* मनोजकुमार मस्के, मांगरूळ "*आठवणी कधीच मरत नाहीत, त्या मनात घर करून राहतात... आणि माणूस जातो तेव्हा फक्त शरीर जातं, आठवणींमध्ये तो कायमच जिवंत राहतो*." आज संजू दादा आपल्याला सोडून जाऊन एक संपूर्ण वर्ष लोटलंय… पण खरं सांगायचं तर, तुमची आठवण, तुमचं हास्य, तुमचं मार्गदर्शन, तुमचं माणुसपण — हे सगळं अजूनही ताजंच वाटतं… अगदी कालच घडलंय असं. नेहमी हसतमुख असणारा, प्रत्येकाशी आपुलकीनं वागणारा, कोणत्याही अडचणीत मार्गदर्शन करणारा, "भविष्यासाठी काहीतरी करून ठेवावं..." असा सल्ला देणारा — हा आपला संजू दादा अचानक गेल्याचं ऐकून काळीज थरथरलं. एलआयसीच्या माध्यमातून अनेक कुटुंबांच्या भविष्याची आखणी करणारा, अनेक घरांना आर्थिक साक्षरतेची दिशा दाखवणारा माणूस... स्वतः मात्र इतक्या अचानकपणे कोणालाही काही न सांगता निघून जाईल असं वाटलंच नव्हतं. दादा, तुमच्या जाण्यानं एक मोठा आधारच निखळला. पत्नी, लहान मुलं, कुटुंबीय — सगळे अजूनही त्या धक्क्यातून सावरले नाहीत. मित्रमंडळी, स्नेही, शेजारी — आजही तुझी वाट पाहतायत. तुझं ते हसणं, मनमोकळं ...

महाराष्ट्राची भळभळती जखम..

Image
महाराष्ट्राची भळभळती जखम... -मधुकर भावे गेला संपूर्ण आठवडा महाराष्ट्र अस्वस्थ आहे. एका पाठोपाठ एक, अशा काही लाजीरवाण्या, संतापजनक आणि मनाला इंगळ्या डसाव्यात अशा घटना घडल्या. त्यामुळे या अस्वस्थ महाराष्ट्राचा तडफडाट झालेला आहे. शिवछत्रपतींच्या पुळ्याची जी विटंबना झाली त्यामुळे तर महराष्ट्राच्या हृदयाच्या चिंधड्या झाल्या. चार लाख एवढे सैन्य असलेल्या औरंगजेबाच्या पुढे जो स्वाभिमानी राजे झुकले नाहीत... अपमान झाल्यावर औरंगजेबाला पाठ दाखवून दरबारातून निघून गेले... आणि अग्र्याच्या कैदेतून शिताफिने निसटले ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोसळून पडणे ही कल्पनाच महाराष्ट्र सहन करू शकत नाही. त्यानंतर त्याची जी चित्र प्रसिद्ध झाली ती पाहताना हृदय विदर्ण व्हावे, अशी स्थिती होती. ते सोशल मिडीयारील व्हायरल होणारे फोटो नंतर थांबवले म्हणून बरे झाले... पण, महाराष्ट्राच्या मनाला बसलेला धक्का हा अस्वस्थ करणारा आहे.... त्या आगोदर बदलापूरमध्ये घडलेला भयानक प्रकार... अंबरनाथमधील किळसवाणा प्रकार आणि पोलीस स्टेशनमध्ये ‘पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला’ या सगळ्या तीन दिवसांच्या वाईट घटनेनंतर महाराष्ट्...

देशासाठी बलिदान करणार्‍या क्रांतिवीरांच्या स्मृती कायम जपल्या पाहिजेत — मनोज मस्के.

Image
देशासाठी बलिदान करणाऱ्या क्रांतिवीरांच्या स्मृती कायम जतन केल्या पाहिजेत. स्वातंत्र्य चळवळील शिराळा पेठ्याचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार मनोज मस्के यांनी केले.  विश्वास विद्यानिकेतन,चिखली विद्यालयात क्रांतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. आर. वरेकर होते.   प्रारंभी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.     यावेळी मनोज मस्के म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीत शिराळा तालुक्यातील क्रांतीकारकांचे योगदान मोठे आहे भारत छोडो आंदोलनाने संपूर्ण देश ढवळून निघाला. यामध्ये बिळाशी, मांगरूळ या गावातून मोठ्या प्रमाणात आंदोलन तीव्र करण्यात आले होते. मांगरूळ गावचे सुपूत्र हुतात्मा धोंडी संतू कुंभार व शंकर भाऊ चांभार या चौदा वर्षे वयाच्या मुलांनी आपले बलिदान दिले. तर ज्ञानू बाळा लुगडे यांच्या डाव्या पायात गोळी लागून जायबंदी झाले.   सांस्कृतिक विभाग प्रमुख मनीषा कुंभार,  श्रीराज मोरे, यशराज कोळी यांनी भाषणे केली. यावेळी समाजसेवक अजित पाटील,  वैशाली शिंदे, प्...